WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!

World Test Championship Final 2021 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना जर ड्रॉ झाला तर भारताला मोठा तोटा होणार आहे, तर न्यूझीलंडला फायदा होणार आहे.

WTC Final 2021 : फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला मोठं नुकसान, न्यूझीलंड फायद्यात!
WTC Final
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 10:06 AM

मुंबई : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्याची (WTC Final 2021) जगभरातील क्रिकेट रसिक बऱ्यांच दिवसांसून वाट पाहत होते. या फायनल सामन्यासाठी आतापर्यंत दोन्ही संघांनी कष्ट घेतले. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी बजावली. हा अंतिम सामना रोमांचक होण्याची अपेक्षा होती, परंतु साऊथॅम्प्टनच्या हवामानाने अंतिम सामन्याची माती केली. पावसाने क्रिकेट रसिकांच्या आनंदावर विरजन पडलं. (World Test Championship Final 2021 If the match is draw India will loss)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीपच्या फायनलचा आजचा चौथा दिवस आहे. यातून पहिल्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ पूर्णपणे न्हावून निघाला. दोन्ही दिवशी एकही बॉल फेकला गेला नाही. तर दुसर्‍या दिवशी खराब प्रकाशामुळे नियोजित वेळेपूर्वीच सामना थांबवावा लागला. आतापर्यंत फक्त तिसर्‍या दिवसाचे खेळ पूर्णत: खेळला गेला आहे. चार दिवसांच्या खेळामध्ये फक्त 141.1 षटकं फेकली गेली आहेत.

फायनल सामना ड्रॉ झाला तर भारताला तोटा!

सामन्यात आतापर्यंत एका संघाचा एक डाव संपला आहे. पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण भेटलेल्या भारतीय संघाने सर्वबाद 217 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल न्‍यूझीलंड संघाने दोन विकेट गमावून 101 धावा केल्या आहेत. म्हणजेच 116 धावा न्यूझीलंड संघ पिछाडीवर आहे. सामन्याचा चौथा दिवस असल्याने हा सामना ड्रॉ च्या दिशेने चाललेला आहे. अशात जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेत्याच्या रूपात घोषित केलं जाईल. परंतु जर सामना ड्रॉ झाला तर भारतीय संघाला सर्वाधिक तोटा होण्याची शक्यता आहे.

…तर भारताची ही संधी जाणार, तोटा होणार!

जर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि न्यूझीलंड संयुक्त विजेते ठरले तर आयसीसी टॉप रँकिंगमध्ये टॉप वर जाण्याची भारताची संधी हातातून जाईल. भारतीय संघ क्रमवारीत दोन नंबरच्या स्थानावर राहिल. 123 रेटिंग पॉईंट्ससह न्यूझीलंड पहिल्या स्थानावर राहिल आणि 122 रेटिंग पॉइंट्ससह भारत दुसऱ्या स्थानावर राहिल. त्याच वेळी जर भारतानं वर्ल्ड चॅम्पियनशिप चा अंतिम सामना जिंकला तर ट्रॉफीबरोबरच भारताला रेटिंग पॉईंट मध्ये देखील फायदा होईल.

न्यूझीलंड फायद्यात!

124 रेटिंग पॉइंट्ससह न्यूझीलंडला धोबीपछाड देऊन भारत पहिल्या स्थानावर पोहोचेल तर वर्ल्ड चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हरल्यानंतर न्यूझीलंड 121 रेटिंग पॉईंटसह क्रमवारीत घसरण होऊन दोन नंबरला पोहचेल. जर अंतिम सामना जिंकला तर 126 रेटिंग पॉइंट्ससह पहिल्या स्थानावर न्यूझीलंडची दादागिरी आहे अशी राहिल. भारताचा मात्र तोटा होऊन 120 रेटिंग पॉइंट्स दुसऱ्या स्थानावर राहील म्हणजेच अंतिम सामना जर झाला तर भारताला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.

(World Test Championship Final 2021 If the match is draw India will loss)

हे ही वाचा :

IND vs NZ WTC Final | महामुकाबल्यात पावसाचं विघ्न, चौथ्या दिवसाचा खेळ रद्द, क्रिकेटप्रेमी नाराज

WTC Final सामन्यातील भारतीय गोलंदाजाच्या काही सुपरफास्ट डिलेव्हरीज, आयसीसीने शेअर केलेला ‘हा’ व्हिडीओ पाहाच

IND vs ENG Womens Match : भारत ‘या’ खेळाडूमुळे वाचवू शकला इंग्लंड विरोधातील टेस्ट, ड्रॉ झालेल्या चुरशीच्या सामन्यात स्लेजिंग झाल्याचाही खुलासा

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.