AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : ऑस्ट्रेलियाने हरवलं वेस्ट इंडिजला पण भारताचं टेन्शन वाढलं, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत लागणार कस

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यासाठी नऊ संघांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक कसोटी मालिका आणि सामन्यानंतर गुणतालिकेचं चित्र पालटतं. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत करताच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

WTC 2025 : ऑस्ट्रेलियाने हरवलं वेस्ट इंडिजला पण भारताचं टेन्शन वाढलं, इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत लागणार कस
WTC 2025 : ऑस्ट्रेलियाच्या खेळीने भारताचं अंतिम फेरीत गणित फिस्कटणार! इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकावीच लागणार
| Updated on: Jan 19, 2024 | 3:06 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमुळे कसोटी क्रिकेटला काही अंशी सुवर्णकाळ प्राप्त झाला आहे, असंच म्हणावं लागेल. प्रत्येक संघ कसोटी मालिका जिंकण्यावर भर देत आहे. कारण विजयी टक्केवारी गुणतालिकेचं गणित पालटून टाकते. त्यामुळे कसोटी सामना आणि मालिका गुणतालिकेचं गणित बदलतं. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. यातील पहिल्या कसोटी सामन्याचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. होम ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाला पराभवाचं पाणी पाजणं वाटतं तितकं सोपं नाही. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. वेस्ट इंडिजला 188 धावांवर सर्वबाद केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 283 धावा करत पहिल्या डावात 95 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिज संघ आघाडी मोडण्यापूर्वीच निम्म्याहून अधिक संघ तंबूत परतला. संबूर्ण संघ 120 धावांवर बाद झाला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 26 धावांचं आव्हान होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एकही गडी न गमवता पूर्ण केलं. कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला पराभूत केल्याने विजयी टक्केवारीत फायदा झाला. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण पुढचा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला तर पहिलं स्थान गाठण्याचं भारतासमोर आव्हान असेल. ऑस्ट्रेलिया 61.11 टक्क्यांसह पहिल्या, भारत 54.16 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश 50 टक्के विजयी टक्केवारीसह संयुक्तरित्या तिसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तान 36.66 टक्क्यांसह सहाव्या, इंग्लंड 15 टक्क्यांसह सातव्या वेस्ट इंडिज 11.11 टक्क्यांसह आठव्या स्थानावर आहे. तर श्रीलंकेने एकही विजय किंवा सामना ड्रॉ केला नसल्याने शून्य टक्क्यांसह शेवटच्या स्थानी आहे.

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचीत 5.96 टक्क्यांचा फरक आहे. ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडिजसोबत शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. तर भारताला इंग्लंड विरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. भारताला ऑस्ट्रेलियाला गुणतालिकेत मागे टाकायचं असेल तर सुरुवातीचे तिन्ही सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर षटकांचं गणित वेळेत सोडवणं गरजेचं आहे. कारण स्लो ओव्हर रेटसाठी विजयी टक्केवारीतले गुण कापले जातात. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला 2 गुणांचा फटका बसला आहे. त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी काळजी घ्यावी लागेल.

पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान.

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.