AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाने किती सामने जिंकणं आवश्यक? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात आणखी टप्पे गाठण्यासाठी उत्सुक आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला जेतेपदाची आस आहे. पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत टीम इंडिया जागा मिळणार का? हा प्रश्न आहे. चला जाणून घेऊयात संपूर्ण गणित

WTC 2025 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी टीम इंडियाने किती सामने जिंकणं आवश्यक? जाणून घ्या
Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 23, 2024 | 2:39 PM
Share

टीम इंडिया दोन वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जागा मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. मात्र दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली . पहिल्या पर्वात न्यूझीलंडने आणि दुसऱ्या पर्वात ऑस्ट्रेलियाने पराभवाची धूळ चारली. त्यामुळे टीम इंडिया पुन्हा एकदा जेतेपदाच्या शर्यतीत आहे. सध्या टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत आघाडीवर आहे. त्यामुळे अंतिम फेरीत पुन्हा स्थान मिळवण्याची सर्वाधिक संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात आणि गौतम गंभीरच्या प्रशिक्षकपदाखाली जेतेपद मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. पण टीम इंडिया गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानावर कायम राहिल का? हा देखील प्रश्न आहे. कारण प्रत्येक कसोटी मालिकेनंतर गुणतालिकेवर फरक पडणार आहे. इंग्लंड वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील निकालामुळेही गुणतालिकेत उलथापालथ झाली आहे. इंग्लंडने तिसरा कसोटी सामना होण्यापू्र्वीच ही मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे भारतीय क्रीडारसिकांची धाकधूक वाढली. कारण विजयी टक्केवारीत आणखी उलथापालथ झाली तर भारताला फटका बसू शकतो.

भारतीय संघाने आतापर्यं 9 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 6 सामन्यात विजय, दोन सामन्यात पराभव आणि 1 सामना अनिर्णित ठरला आहे. भारतीय 74 गुण आणि 68.52 च्या विजयी टक्केवारीसह आघाडीवर आहे. तर ऑस्ट्रेलियाने एकूण 12 सामने खेळले असून 8 सामन्यात विजय, तीन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघ 90 गुण आणि 62.50 विजयी टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे. असं असलं तरी अंतिम फेरीच्या शर्यतीत न्यूझीलंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि इंग्लंड हे संघ देखील आहेत. न्यूझीलंड आणि श्रीलंकेची विजयी टक्केवारी 50.00 इतकी आहे. पाकिस्तानची 36.66, तर इंग्लंडची 31.25 इतकी विजयी टक्केवारी आहे.

WTC_2025 (2)

Source : ICC

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम फेरी कशी गाठणार?

भारतीय संघाचा अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी तीन कसोटी मालिका शिल्लक आहे. या तीन पैकी 2 मालिका काहीही करून जिंकाव्या लागतील. इतकंच काय तर त्यात व्हाईट वॉश देणं गरजेचं आहे. जेणेकरून विजयी टक्केवारी मजबूत होईल. भारतीय बांग्लादेशसोबत 2 सामन्यांची, न्यूझीलंडसोबत तीन सामन्यांची, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड आणि बांग्लादेश हे संघ भारतात येणार आहेत. त्यामुळे त्यांना व्हाईट वॉश देणं शक्य होईल. पण पाच सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे. त्यामुळे या मालिकेत कस लागेल. दुसरीकडे, उर्वरित 10 कसोटी सामन्यापैकी 6-7 सामने जिंकले तर टीम इंडियाचं तिकीट पक्कं होईल. त्यामुळे न्यूझीलंड आणि बांग्लादेशविरुद्धचे पाच सामने जिंकले तर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दडपण कमी होईल.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.