AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final Scenarios : दुसऱ्या कसोटी पराभवानंतर भारत अंतिम फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने दारूण पराभव केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने पराभवाची मालिका सुरूच ठेवली आहे. त्यामुळे त्याच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. असं असताना भारत आता अंतिम फेरी गाठणार का? असा प्रश्न आहे. चला जाणून घेऊयात.

WTC Final Scenarios : दुसऱ्या कसोटी पराभवानंतर भारत अंतिम फेरीत कसा पोहोचणार? जाणून घ्या
| Updated on: Dec 08, 2024 | 3:20 PM
Share

भारत विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने 10 गडी राखून विजय मिळवला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत दोन स्थानांची घसरण झाली आहे. अव्वल स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरण झाल्यानंतर भारतीय संघ आता अंतिम फेरी गाठणार की नाही असा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलिया संघ एकूण 60.71 विजयी टक्केवारीसह अव्वल स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिका संघाने 59.26 विजयी टक्केवारीसह दुसरे स्थान कायम राखले आहे. ॲडलेड कसोटी सामना हरलेली टीम इंडिया 57.29 विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम शर्यतीत अजूनही कायम आहे. पण काही समीकरणं जुळून येणं गरजेचं आहे. भारताचे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अजून तीन सामने बाकी आहेत, टीम इंडिया हे सामने जिंकून आणि बॉर्डर-गावस्कर मालिका 4-1 ने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकते.

भारताने कसोटी मालिका 4-1 मालिका जिंकल्यास भारताचे 146 गुण आणि 64.05 विजयी टक्केवारी होऊ शकते. त्यामुळे सध्या अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची गोची होईल. पण ऑस्ट्रेलियात तीन कसोटी सामने जिंकणे हे भारतीय संघासाठी मोठे आव्हान असेल.

भारताने मालिका 3-1 ने जिंकली, तर गणित वेगळं असेल. पुढील तीन सामन्यांपैकी एक सामना ड्रा झाला आणि दोन जिंकले तर भारताचे 138 गुण आणि 60.52 विजयी ट्क्केवारी होईल. अशा परिस्थितीती ऑस्ट्रेलियाची विजयी टक्केवारी 57 होईल. पण ऑस्ट्रेलियाचे श्रीलंकेविरुद्ध 2 सामने शिल्लक आहेत. त्यामुळे ही स्थिती भारताच्या हातात नसेल. दक्षिण आफ्रिकेनेही अंतिम फेरीसाठी दावा केला आहे.

भारताने ऑस्ट्रेलियाला मालिकेत 3-2 ने पराभूत केले. तर भारताचे 134 गुण आणि 58.77 विजयी टक्केवारी होईल. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेला अंतिम फेरीसाठी संधी मिळेल. कारण श्रीलंकेविरुद्धचा शेवटचा सामना सुरु आहे आणि विजयी होईल अशी स्थिती आहे. तर घरच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध आणखी दोन सामने खेळायचे आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळीवर भारताचं स्थान ठरेल.

भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी श्रीलंकेच्या मदतीची आवश्यकता भासणार आहे. कारण ऑस्ट्रेलिया दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेत जाणार आहे. घरच्या मैदानावर दोन नाही तर किमान एका सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल.

Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?