AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2027: भारताच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ, दुसरा सामना किती महत्त्वाचा?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 मालिकेत भारत-श्रीलंका, ऑस्ट्रेलिया- बांग्लादेश आणि इंग्लंड-पाकिस्तान कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील निकालामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर फरक दिसून येत आहे. असं असताना भारत आणि बांगलादेशचा दुसरा सामना खूपच महत्त्वाचा आहे.

WTC 2027: भारताच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ, दुसरा सामना किती महत्त्वाचा?
WTC 2027: भारताच्या विजयाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत उलथापालथ, दुसरा सामना किती महत्त्वाचा?Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 19, 2026 | 5:36 PM
Share

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेत एकूण 9 संघ खेळत आहेत. त्यापैकी इंग्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. तर अव्वल दोन स्थानी जागा मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड, बांग्लादेश, भारत आणि श्रीलंका यांच्यात रस्सीखेंच आहे. तीन संघ वगळता इतर संघांच्या कसोटी मालिकेतील निकालावर गुणतालिकेत मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलिया पराभूत करत गुणतालिकेत मोठा उलटफेर केला होता. त्यानंतर भारताने श्रीलंकेला पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेचं चित्र बदललं आहे. श्रीलंकेला पराभूत करत भारतीय संघ आताही पाचव्या स्थानावरच आहे. पण विजयी टक्केवारीत वाढ झाली आहे. तर 12 गुणही मिळाले आहेत. आता भारत आणि बांगलादेशच्या दुसऱ्या सामन्याकडे लक्ष लागून आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्याचा निकाल काय?

भारताचा दुसरा कसोटी सामना श्रीलंकेशी 23 ऑगस्टपासून कोलंबोत होणार आहे. हा सामना भारताला काही करून जिंकणं भाग आहे. हा सामना जिंकला तर भारताच्या विजयी टक्केवारी फरक पडेल. भारताने श्रीलंकेविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला तर विजयी टक्केवारी 57.58 टक्के होईल. पण पाचव्या स्थानावरच राहिल. यासाठी ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत करावं लागेल. जर तसं झालं तर भारत चौथ्या स्थानावर पोहोचल आणि बांग्लादेश 55.56 विजयी टक्केवारीसह पाचव्या स्थानावर घसरेल. पण दोन्ही सामने ड्रॉ झाले तर बांगलादेशला फायदा होईल आणि चौथ्या स्थानावरच राहिल.

भारताचं अंतिम फेरीचं गणित काय?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणातालिकेत ऑस्ट्रेलिया 77.78 विजयी टक्केवारीसह पहिल्या स्थानावर, दक्षिण अफ्रिका 75 टक्के विजयी टक्केवारीसह दुसऱ्या, न्यूझीलंड 72.22 टक्के विजयी टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत एकूण 8 सामने शिल्लक आहे. भारताने आठ पैकी 7 सामने जिंकले तर टॉप 2 मधील स्थान पक्कं होईल. इतकंच काय तर सहा विजय, एक ड्रॉ आणि एक सामना गमावला तरी काही फरक पडणार नाही. पण दोन सामन्यात पराभव झाला तर गणित बिघडेल. त्यामुळे भारतासाठी प्रत्येक सामना करो या मरोची स्थिती आहे. त्यात न्यूझीलंडला त्यांच्याच भूमीत 3-0 ने पराभूत करणं सोपं नाही.

Follow Us
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची टिप्पणी
बहुमतावेळी शिंदे शिवसेनेचे सदस्य... न्यायमुर्ती बागची यांची महत्त्वाची टिप्पणी, सुनावणीदरम्यान मोठा ट्विस्ट
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी;
शिवसेना पक्षाचे चिन्ह गोठवा, धनुष्यबाणाबाबत सिब्बल यांची मोठी मागणी; सुनावणीत काय घडलं?
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं
फडणवीस राज्यपालांना... कोर्टातील सुनावणीदरम्यान प्रथमच आलं फडणवीसांचं नाव, फुटीच्या वेळी पडद्याआड काय काय घडलं होतं?
मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी...
मोठी बातमी! प्रस्ताव सुप्रीम कोर्टाने मान्य केल्यानंतरही नार्वेकरांनी... कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक