AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Cricket Team: टीम इंडियाला मोठा धक्का, हा युवा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

Indian Cricket Team: टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. युवा खेळाडू दुखापतीमुळे टी 20 मालिकेतून बाहेर पडला आहे.

Indian Cricket Team: टीम इंडियाला मोठा धक्का, हा युवा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर
indian cricket team huddle talkImage Credit source: BCCI
| Updated on: Jun 26, 2024 | 9:22 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड वर्ल्ड कप 2024 सेमी फायनलआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर शिवम दुबे याला बीसीसीआयने मोठी संधी दिली आहे. बीसीसीआयने शिवम दुबेला वर्ल्ड कपनंतर विश्रांती देण्याऐवजी त्याला झिंबाब्वे दौऱ्यासाठी संधी देण्यात आली आहे. शिवम दुबेला आयपीएलच्या 17 व्या मोसमात बॉल आणि बॅटने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नितीश रेड्डी याच्या जागी समावेश करण्यात आला आहे. नितीश रेड्डीला झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20 सीरिजआधी दुखापत झाल्याने त्याला मालिकेतून बाहेर पडावं लागलं आहे. बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन ही माहिती दिली आहे. नितीशला नेमकं काय झालंय? हे सांगितलं नाही, मात्र त्याच्यावर बीसीसीआयचं वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याचं बीसीसीआयने म्हटलंय.

टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कपनंतर झिंबाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात टी 20 मालिका होणार आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. मालिकेला 6 जुलैपासून सुरुवात होणार आहे. मात्र तोवर नितीश झालेल्या दुखापतीतून सावरु शकणार नसल्याचं निश्चित असल्याने त्याला बाहेर पडावं लागलं. त्यामुळे शिवमचा समावेश केला गेला आहे.

युवासेनाला संधी

दरम्यान बीसीसीआय निवड समितीने मिशन झिंबाब्वेसाठी युवा आणि नव्या दमाच्या खेळाडूंना संधी दिली आहे. झिंबाब्वे विरूद्धच्या मालिकेत शुबमन गिल हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तसेच आयपीएलमध्ये विविध संघांकडून खेळणाऱ्या तरुण तडफदार खेळाडूंची पहिल्यांदा निवड केली गेली आहे. तुषार देशपांडे (चेन्नई), रियान पराग (राजस्थान) आणि अभिषेक शर्मा (हैदराबाद) या संघांसाठी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या या खेळाडूंची भारतीय संघात पहिल्यांदा निवड करण्यात आली आहे.

शिवम दुबेला संधी

टी 20 मालिकेचं शेड्यूल

पहिला सामना, 6 जुलै. दुसरा सामना, 7 जुलै. तिसरा सामना, 10 जुलै. चौथा सामना, 13 जुलै. पाचवा सामना, 14 जुलै.

टीम इंडियाचा सुधारित संघ: शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, अभिषेक शर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकटेकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर ), रियान पराग, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, खलील अहमद, मुकेश कुमार, तुषार देशपांडे आणि शिवम दुबे.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं