AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“टीम इंडियासोबत आलो तेव्हा सचिन तेंडुलकर नाराज होता”, माजी प्रशिक्षकाचा खुलासा

माजी प्रशिक्षकानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबाबत मोठा खुलासा केला आहे. 2007 साली सचिनची मानसिकता कशी होती आणि त्याचा एक निर्णय किती चुकीचा ठरला असता, याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

टीम इंडियासोबत आलो तेव्हा सचिन तेंडुलकर नाराज होता, माजी प्रशिक्षकाचा खुलासा
...तर 80 शतकंही झाली नसती! सचिन तेंडुलकरबाबत माजी प्रशिक्षकाचा मोठा दावा Image Credit source: AFP
| Updated on: Feb 14, 2023 | 7:42 PM
Share

मुंबई : भारत हा क्रिकेट वेडा देश असला तरी आयसीसी स्पर्धेत हवी तशी कामगिरी नाही. त्यामुळे काही माजी क्रिकेटपटू मालिका खेळणारा संघ अशी टीका करतात. आतापर्यंत भारताने दोन वनडे वर्ल्डकप आणि एक टी 20 वर्ल्डकप जिंकला आहे.आता वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात होणार असून रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. भारताने शेवटचा वर्ल्डकप 2011 साली जिंकला होता.2011 वर्ल्डकप स्पर्धेत प्रशिक्षक गॅरी कर्स्टननं मोलाची भूमिका बजावली होती. मात्र माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी सचिन तेंडुलकरबाबत खुलासा केला आहे.एका पॉडकास्ट दिलेल्या मुलाखतीत कर्स्टननं आपला अनुभव शेअर केला आहे. तसेच सचिन तेंडुलकरबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

“मी जेव्हा टीम इंडियासोबत आलो त्यापूर्वी ग्रेग चॅपलमुळे टीम अस्वस्थ होती. काही दिग्गज खेळाडू उदास होते. 2007 वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची स्थिती एकदम वाईट होती. मी जेव्हा टीम इंडियाचं प्रशिक्षकपद स्वीकारलं तेव्हा संघाला जेतेपद मिळवून देण्याचा हेतू होता. त्यात संघात भीतीचं वातावरण होतं.सचिन तेंडुलकर संघातील त्या वातावरणाने नाराज होता. तसेच निवृत्ती घेण्याचा विचारात होता.तेव्हा सचिनला समजावणं म्हणजे आव्हान होतं. पण त्यानं ऐकलं आणि संघाला मोठं योगदान दिलं.” असं गॅरी कर्स्टननं सांगितलं.

सचिन तेंडुलकर 2013 पर्यंत टीम इंडियासाठी खेळला. सचिननं 2007 साली निवृत्ती घेतली असती तर त्याच्या नावावर 78 शतकं असती. सचिनने तेव्हा कसोटीत 37 आणि वनडेमध्ये 41 शतकं झळकावली होती. आणखी सात वर्षे क्रिकेट खेळून सचिननं शतकाचं शतक साजरं केलं. गॅरी कर्स्टन 2007 ते 2011 या कालावधीत टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. गॅरी कर्स्टन आणि एमएस धोनी या जोडीनं टीम इंडियाला 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप जिंकून दिला.

सचिन तेंडुलकरची क्रिकेट कारकिर्द

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यात 15 नोव्हेंबर 1989 साली पदार्पण केलं होतं. तर 18 डिसेंबर 1989 पाकिस्तानविरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. 14 नोव्हेंबर 2013 रोजी शेवटचा कसोटी सामना खेळला. तर 18 मार्च 2012 रोजी शेवटचा वनडे सामना खेळला. सचिन तेंडुलकर आपल्या क्रिकेट कारकिर्दीत एकमेव टी 20 सामना खेळला आहे. सचिन तेंडुलकर 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि 1 टी 20 सामना खेळला आहे. कसोटीत सचिननं 51 शतकं, 6 द्विशतकं आणि 68 अर्धशतकं झळकावली आहेत. वनडेमध्ये 46 शतकं, 1 द्विशतक आणि 96 अर्धशतकं झळकावली आहेत. कसोटीत 46 गडी, वनडेत 154 गडी आणि टी 20 मध्ये 1 गडी बाद केला आहे.

Follow Us
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची....
मराठी सक्तीवर निरुपमांचा यू-टर्न; अंमलबजावणी पुढे ढकलण्याची.....
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर
राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेत नेमकं कोण जाणार? मोठी अपडेट समोर.
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणुकीच्या मैदानाबाहेर?.
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं...
भारतात लव्ह जिहाद... शिवरायांबाबतच्या वक्तव्यानंतर बागेश्वर बाबाचं....
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट
कोल्हापुरात आंदोलन पेटलं; बिंदू चौकात पोलिस-आंदोलकांमध्ये झटापट.
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात...
माझ्या मर्जीशिवायच... अमरावती प्रकरणात मोठा ट्विस्ट, अयान विरोधात....
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा...
शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; परदेशी समितीचा अहवाल सादर, सरकारची घोषणा....
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला
सर्वांचे पेढे खा, आमच्याच पेढ्यावर लक्ष का? संजय राऊतांचा मिश्किल टोला.
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र..
मोठी बातमी! शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी एक नाव जवळपास निश्चित, मात्र...
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र
थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केजरीवालांचं पत्र.