AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: भारताच्या विजयामध्ये गोलंदाजांचे योगदान अन् कर्णधाराचा सल्ला आला टीम इंडियाच्या कामी

पहिल्या सामन्यात भारतीय संघाला यश मिळाले असले तरी सुरवातीच्या फलंदाजांची कामगिरी ही निराशाजनक राहिलेली होती. सलामीला उतरलेले सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा यासारखे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. धावसंख्येचा आलेख चढता ठेवायचा असल्यास क्रीजवक टिकून राहणे हेच महत्वाचे होते आणि तेच रोहित शर्मा व दिनेश कार्तिक यांनी केले.

IND vs WI: भारताच्या विजयामध्ये गोलंदाजांचे योगदान अन् कर्णधाराचा सल्ला आला टीम इंडियाच्या कामी
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा
| Updated on: Jul 30, 2022 | 9:26 AM
Share

मुंबई : वेस्ट इंडिजमधील त्रिनिदाद येथे पार पडलेल्या पहिल्या (T-20 Match) टी-20 सामन्यात भारताने 68 धावांनी विजय मिळवला आहे. यामध्ये 191 एवढ्या धावांचा डोंगर उभा करुन देखील वेस्ट इंडिजकडे असलेल्या फलंदाजीच्या भरगच्च यादीसमोर निभाव लागतो की नाही अशी स्थिती होती. शिवाय (West Indies) इंडिज फलंदाजांनी सुरवातही दणक्यात केली. सामना रंगात येत असतानाच भुवनेश्वर कुमार याने अर्शदीपने मेयर्सला बाद केले. पहिली विकेट गमावल्यानंतर लागलेली गळती पुन्हा इंडिज फलंदाज रोखू शकले नाही. तर मॅचला सुरवात होण्यापूर्वी (Rohit Sharma) कर्णधार रोहित शर्मा याने खेळाडूंना दिलेला सल्लाही तेवढाच कामी आला आहे. अधिकच्या धावा करण्यासाठी स्पीचवर टिकून राहणे महत्वाचे असल्याचे त्यांने सांगितले होते. त्यामुळेच पहिल्या विकेट गेल्या तरी तो आणि दिनेश कार्तिक यांनी एक आव्हानात्मत धावसंख्या केली. त्यामुळे गोलंदाजांची कामगिरी आणि कर्णधाराचा सल्ला पहिल्या सामन्यात उपयोगी ठरलेला आहे.

रोहित शर्माकडून फलंदाजांना सल्ला

पहिल्या सामन्यात भारतीय संघाला यश मिळाले असले तरी सुरवातीच्या फलंदाजांची कामगिरी ही निराशाजनक राहिलेली होती. सलामीला उतरलेले सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा यासारखे फलंदाज फार काळ टिकू शकले नाहीत. धावसंख्येचा आलेख चढता ठेवायचा असल्यास क्रीजवक टिकून राहणे हेच महत्वाचे होते आणि तेच रोहित शर्मा व दिनेश कार्तिक यांनी केले. रोहित म्हणाला, “आम्हाला माहित होते की हे थोडे कठीण होणार आहे, सुरुवातीला शॉट मारणे सोपे नव्हते. क्रीजवर गोठलेल्या खेळाडूंनी बराच काळ फलंदाजी करावी आणि ज्या पद्धतीने आम्ही पहिला डाव संपवला, तो एक चांगला प्रयत्न होता.”

अपेक्षेपेक्षा अधिक धावा

इंडिज समोर 191 धावांचा डोंगर उभा राहिला असला तरी एवढ्या धावा होतील अशी अपेक्षा कर्णधार रोहित शर्माला देखील नव्हती. हे त्यानेच कबुल केले आहे. 10 ओव्हरपर्यंतही आपण एवढ्या धावा करु शकताल असे त्याला वाटलेले नव्हते. मात्र, सर्वांनीच अंतिम टप्प्यात कामगिरी केल्याने ह्या धावा करता आल्या. विजयासाठी आवश्यक असलेले तीन टप्पे पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय संघ करीत असल्याचे रोहित शर्मा याने सांगितले आहे.

सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.