AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशला आयसीसीचा मोठा झटका, भारतात आल्याशिवाय गत्यंतर नाहीच.. थेट दिले मोठे आदेश

बांगलादेश गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. बांगलादेशात मोठा हिंसाचार सुरू असून हिंदू लोकांवर अत्याचार केली जात आहेत. आता बांगलादेशच्या क्रिकेट बोर्डला आयसीसीने मोठा झटका दिला.

बांगलादेशला आयसीसीचा मोठा झटका, भारतात आल्याशिवाय गत्यंतर नाहीच.. थेट दिले मोठे आदेश
Bangladesh Cricket
| Updated on: Jan 07, 2026 | 9:37 AM
Share

भारत आणि बांगलादेशातील तणाव वाढला आहे. बांगलादेशातील क्रिकेटरला आयपीएल संघात घेतल्यामुळे मोठी खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात ज्याप्रकारे हिंदू लोकांवर अत्याचार होत आहेत, त्यानंतर बांगलादेशातील खेळाडूंना आयपीएलमध्ये घेण्यास तीव्र विरोध भारतातून झाला. हेच नाही तर शाहरूख खानवरही लोकांनी टीका केली. शाहरूख खानच्या आयपीएल संघात बांगलादेशी खेळाडू खेळणार होता. ज्यानंतर तणाव वाढला. आयसीसीने टी-20 विश्वचषकाचे ठिकाण बदलण्याची बांगलादेशची मागणी फेटाळून लावली आहे. बांगलादेशी खेळाडू आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बांगलादेशच्या क्रिकेट बोर्डाने थेट टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येणार नसल्याची भूमिका घेत हे सामने इतरत्र हालवण्याची मागणी केली.

आता आयसीसीने थेट बांगलादेश क्रिकेट बोर्डाला मोठा झटका दिला. आयसीसीने स्पष्ट शब्दात बांगलादेश क्रिकेट बोर्डाला सांगितले की, जर तुम्ही टी-20 विश्वचषकाचे सामने खेळण्यासाठी भारतात गेला नाही तर तुमचे गुण कापले जातील. हा मोठा झटका आयसीसीने दिला. बांगलादेशच्या क्रिकेट संघाला भारतात येऊन क्रिकेट खेळल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. आयसीसीने एका व्हर्च्युअल बैठकीदरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डाला माहिती दिली की, सुरक्षेच्या कारणांमुळे भारताबाहेर सामने खेळण्याची त्यांची विनंती फेटाळण्यात येत आहे.

आयसीसीने सुरक्षेचे कारण देत भारतात सामने खेळावी लागतील स्पष्ट केले. बांगलादेश क्रिकेट बोर्ड श्रीलंकेत सामने घेण्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. भारताने बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा थयथयाट बघायला मिळतोय. बीसीसीआयच्या सांगण्यावरून आयपीएल संघ केकेआरने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिझुर रहमानला करारमुक्त केले.

केकेआरने आयपीएल संघात मुस्तफिझुर रहमान याला घेतले होते. मात्र, होणारा विरोध आणि बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयानंतर मुस्तफिझुर रहमान याला आयपीएलमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. हेच नाही तर केकेआरसह शाहरूख खान याच्यावरही जोरदार टीका मुस्तफिझुर रहमान याला घेतल्यानंतर करण्यात आली. त्यानंतर टी-20 विश्वचषकही खेळण्यासाठी आम्ही भारतात येणार नसल्याची भूमिका बांगलादेशने घेतली. मात्र, मोठा झटका आयसीसीने बांगलादेशला दिला आहे.

6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!
6 पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, सांगली पालिकेच्या निवडणुकीची चर्चा!.
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप
...त्याचाच राग उद्धव ठाकरे यांनी धरला अन्.. संतोष धुरी यांचा नवा आरोप.
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्..
लातूरमध्ये फडणवीसांचे डॅमेज कंट्रोल, देशमुखांच्या योगदानाला सलाम अन्...
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका
उद्धव मामूंना खान, शेख चालतात, पण धुरी, देशपांडे नाही, साटम यांची टीका.
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट
इकडे भाजप-काँग्रेसच्या युती, तिकडे सपकाळांचा मोठा निर्णय, नेत्याला थेट.
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ
जलील यांच्या कारवरील हल्ल्यामागे कोण? दोन मंत्र्यांची नाव आल्यानं खळबळ.
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?
संभाजीनगरात MIM च्या सभेपूर्वीच जलील यांच्या गाडीवर हल्ला, घडलं काय?.
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका
ज्याची लाज वाटायला हवी त्यावर माज..चित्रा वाघ यांची ठाकरेंवर जहरी टीका.
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी
कांदिवलीतील बेकायदेशीर आरएमसी प्रकल्प बंद करावा, बसपाची मागणी.
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्...
बावनकुळेंच्या भाषणादरम्यान घुसला भाजपचा बंडखोर, स्टेजवर आला अन्....