AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: दुसऱ्या वनडेत पाऊस खलनायक ठरणार? सामन्यापूर्वी हवामान कसे असेल जाणून घ्या

पहिला सामना इंडिया आणि बांगलादेश यांच्यात रोमांचक झाला.

IND vs BAN: दुसऱ्या वनडेत पाऊस खलनायक ठरणार? सामन्यापूर्वी हवामान कसे असेल जाणून घ्या
IND vs BANImage Credit source: twitter
| Updated on: Dec 07, 2022 | 7:45 AM
Share

मुंबई : टीम इंडिया (IND) आणि बांगलादेश (BAN) यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. पहिला सामना बांगलादेश टीमने जिंकल्यामुळे आजचा सामना टीम इंडियाला जिंकावा लागणार आहे. कारण टीम इंडियाचा आजच्या सामन्यात पराभव झाल्यास बांगलादेश टीम ही मालिका जिंकणार आहे. त्यामुळे आजची मॅच (Today Match) टीम इंडियासाठी करो या मरो अशी स्थिती आहे.

पहिला सामना इंडिया आणि बांगलादेश यांच्यात रोमांचक झाला. टीम इंडिया सामना जिंकणार अशी स्थिती असताना, बांगलादेशच्या अंतिम टप्प्यातील खेळाडूंनी मोठी भागीदारी करुन बांगलादेश टीमला विजय मिळवून दिला. त्यानंतर बांगलादेश टीमचं चाहत्यांनी सोशल मीडियावर जोरदार कौतुक केलं. त्याचबरोबर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह अनेक खेळाडूंवर चाहत्यांनी जोरदार टीका केली.

सध्याचा दौरा टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी अधिक महत्त्वाचा आहे. कारण इंडियामध्ये पुढच्यावर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्या टीममध्ये ज्या खेळाडूंना संधी हवी असेल, त्यांना सध्याच्या मालिकेत चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

आज शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये टीम इंडियाचा दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. आजच्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. आज साडेअकरा वाजता मॅच सुरु होईल.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, लोकेश राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन, उमरान मलिक.

बांगलादेश टीम

लिटन दास (कर्णधार, यष्टिरक्षक), नजमुल हुसेन शांती, यासिर अली, आसिफ हुसैन, महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन मिराज, शकीब अल हसन, मुस्तफिजुर रहमान, नमस अहमद, इबादत हुसेन.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.