AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: आज होणार T20 मालिकेतील निर्णायक सामना, जाणून घ्या हवामान अंदाज

Napier Weather Report : जाणून घ्या हवामान अंदाज

IND vs NZ: आज होणार T20 मालिकेतील निर्णायक सामना, जाणून घ्या हवामान अंदाज
ind vs nz
| Updated on: Nov 22, 2022 | 9:25 AM
Share

मुंबई : न्यूझिलंडमध्ये (NZ) सध्या अनेक ठिकणी पाऊस सुरु आहे. टीम इंडियाचा आज T20 मालिकेतील निर्णायक सामना नेपियार (Napier) या ठिकाणी होणार आहे. भारतीय वेळेनुसार आज दुपारी बारा वाजता सामना सुरु होईल. आजच्या सामन्यात दोन्ही टीममध्ये बदल पाहायला मिळणार आहे. न्यूझिलंड टीममध्ये आज कर्णधार विल्यमसन (Kane Williamson) खेळणार नाही. त्याचबरोबर टीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

T20 मालिकेतील पहिला सामना मुसळधार पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना टीम इंडियाने चांगली खेळी करुन जिंकला. त्यामुळे आजच्या निर्णायक सामन्यात टीम इंडिया कशी कामगिरी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. हार्दीक पांड्याच्या नेतृत्वात पहिल्यांदा टीम इंडियाने न्यूझिलंड दौऱ्यावर गेली आहे.

न्यूझिलंडमध्ये सध्या स्वच्छ हवामान आहे, सायंकाळी ढग जमा होण्याची शक्यता आहे. जरी ढग जमा झाले, तरी पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजच्या मॅच होणार हे निश्चित आहे. विल्यमसन नसताना टीम साऊदीकडे न्यूझिलंड टीमचे नेतृत्व देण्यात आले आहे.

भारताचा संभाव्य संघ:

इशान किशन, ऋषभ पंत , सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल.

न्यूझीलंडचा संभाव्य संघ:

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे , मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, टिम साउथी, इश सोधी, अॅडम मिल्ने आणि लॉकी फर्ग्युसन.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.