AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup :’भारताला पाकिस्तान आवडत नाही, म्हणून जाणूनबुजून झेल सोडले’, क्रिकेटपटूचा गंभीर आरोप

विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात सुरु झाल्यापासून क्रिकेटच्या चाहत्यांना दोन टीममधील संघर्ष पाहायला मिळत आहे.

T20 World Cup :'भारताला पाकिस्तान आवडत नाही, म्हणून जाणूनबुजून झेल सोडले',  क्रिकेटपटूचा गंभीर आरोप
Team India Image Credit source: BCCI
| Updated on: Nov 01, 2022 | 11:14 AM
Share

नवी दिल्ली : पाकिस्तान टीमचा (Pakistan Team) महत्त्वाच्या मॅचमध्ये पराभव झाल्यापासून त्याचा सेमीफायनलमध्ये (Semifinale) पोहोचण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे चाहते टीम इंडियाला (Team India) दोष देत आहेत. टीम इंडिया मुद्दाम आफ्रिकेविरुद्ध (SA) हारल्याचा आरोप सोशल मीडियावर पाकिस्तानच्या चाहत्यांनी केला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या एका माजी खेळाडूने ‘भारताला पाकिस्तान आवडत नाही, म्हणून जाणूनबुजून झेल सोडले’, असा गंभीर आरोप केला आहे.

विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात सुरु झाल्यापासून क्रिकेटच्या चाहत्यांना दोन टीममधील संघर्ष पाहायला मिळत आहे. सद्या ऑस्ट्रेलियात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे अनेकदा सामन्यादरम्यान व्यत्यय आला आहे.

टीम इंडियाने सुरुवातीच्या मॅचमध्ये पाकिस्तान टीमचा पराभव केला. दुसऱ्या मॅचमध्ये नेदरलॅंड टीमचा पराभव केला. टीम इंडियाकडे सद्या चार गुण आहेत. तसेच आतापर्यंत टीम इंडियातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. टीम इंडियाचा तीन मॅचमध्ये फक्त एक पराभव झाला आहे.

पाकिस्तान टीमचे माजी खेळाडू सलीम मलिक यांनी पाकिस्तानी चैनल 24 न्यूज एचडी या वाहिनीला एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीमध्ये “टीम इंडियाला पाकिस्तान आवडत नाही, पाकिस्तान टीम सेमीफायनलमध्ये नको असल्यामुळे टीम इंडिया आफ्रिकेविरुद्ध मुद्दाम हारली. विशेष म्हणजे टीम इंडियातील काही खेळाडूंनी महत्त्वाचे कॅच सोडले.” असा गंभीर आरोप केला आहे.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.