AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: मॅच संपल्यानंतर पाकिस्तानी टीम वाट पाहत होती; पण भारतीय खेळाडूंनी थेट.. ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं?

IND vs PAK: आशिया कप 2025 मधील रविवारच्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला. या संपूर्ण सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी क्रिकेटर्सपासून अंतर ठेवलं. टॉसदरम्यानही सूर्यकुमार यादवने हस्तांदोलन करणं टाळलं.

IND vs PAK: मॅच संपल्यानंतर पाकिस्तानी टीम वाट पाहत होती; पण भारतीय खेळाडूंनी थेट.. ड्रेसिंग रुममध्ये काय घडलं?
IND vs PakImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 15, 2025 | 9:09 AM
Share

IND vs PAK: पाकिस्तानवरील वर्चस्व कायम राखताना टीम इंडियाने आशिया चषक ट्वेन्टी-20 स्पर्धेत रविवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. पहलगाम इथला दहशतवादी हल्ला, त्यानंतर भारताने राबवलेलं ‘ऑपरेशन सिंदूर’ याच्या पार्श्वभूमीवर या दोन देशांतील संबंध आणखीच बिघडले. भारताने हा सामना खेळू नये अशी मागणी देशातील बहुतांश विरोधी पक्षांकडून करण्यात आली. परंतु केंद्र सरकारने आधीच परवानगी दिल्यामुळे आशिया चषकातील साखळी सामना ठरल्याप्रमाणे पार पडला. मैदानाबाहेरील या तणावाचा मैदानावरही परिणाम दिसून आला. एरवी नाणेफेक झाल्यानंतर दोन्ही संघांचे कर्णधार हस्तांदोलन करतात. मात्र, आशिया चषकाच्या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी भारताचा सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा सलमान आघा यांनी हस्तांदोलन करणं टाळलं. इतकंच नाही तर, सामन्यानंतरही दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हात मिळवले नाहीत.

भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांमधील तणाव संपूर्ण मॅचदरम्यान पहायला मिळाला. षटकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिल्यानंतर सूर्यकुमार थेट पुढे निघून गेला. त्याने पाकिस्तानी खेळाडूंकडे पाहिलंही नाही. तर दुसरीकडे पाकिस्तानी खेळाडू मैदानावर प्रतीक्षा करत असताना भारतीय खेळाडूंनी आपल्या ड्रेसिंग रुमचा दरवाजा बंद केला. या सामन्यापूर्वी खेळाडूंचा आणि चाहत्यांचाही प्रचंड उत्साह होता. कारण पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांचे संघ समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ होती. या सामन्याबाबत खूप विरोध झाला. परंतु भारताने हा सामना खेळला आणि पाकिस्तानला हरवलं.

सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “काही गोष्टी या क्रीडा भावनेपेक्षा वरच्या असतात.” त्याआधी सामन्यानंतरच्या समारंभात सूर्यकुमारने पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांसोबत असल्याची भावना व्यक्त केली होती. “हा विजय आम्ही आमच्या सर्व सशस्त्र दलांना समर्पित करू इच्छितो. आशा आहे की ते आम्हाला प्रेरणा देत राहतील”, असं तो म्हणाला होता. तर पाकिस्तानच्या टीमसोबत हस्तांदोलन न करण्याच्या निर्णयाबद्दल सूर्यकुमार पुढे म्हणाला, “आमचं सरकार आणि बीसीसीआय या निर्णयावर एकमत आहेत. आम्ही इथे फक्त खेळ खेळण्यासाठी आलो होतो. मला वाटतं की आम्ही त्यांना योग्य उत्तर दिलं आहे.”

Follow Us
दक्षिणेकडे भाजपला मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याचा अचानक राजीनामा
दक्षिणेकडे भाजपला सर्वात मोठा धक्का, पक्षातील बड्या नेत्याने अचानक दिला राजीनामा अन्...
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची बीएलए नियुक्तीत उदासीनता
एसआयआर मोहिमेत विरोधी पक्षांची उदासीनता. बीएलए नियुक्तीत राजकीय पक्षांचे दुर्लक्ष
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट...
आमच्या पक्षात या... रामदास आठवलेंनी अभिजीत दीपकेला खुली ऑफर, थेट म्हणाले...
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... मोठी खळबळ
OBC मंत्र्यांची गोंडस मुलं अन् पैसा पाहून मराठी मुली... नवनाथ वाघमारांचे वादग्रस्त विधान; मराठा समाज आक्रमक, थेट...
वैद्यनाथ मंदिरात पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी
श्रावण सोमवार आणि नागपंचमीनिमित्त वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिर उजळून निघाले, भक्तांकडून जलाभिषेक
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप
मनोज जरांगे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप:
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी: मुंडेगाव ते पाडळीपर्यंत वाहनांच्या रांगा
संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
नाशिकमधील खड्डे पाहणीदरम्यान संजय राऊत वाहतूक कोंडीत अडकले
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...