AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | विराट फार आवेशात निर्णय घेतो, गंभीरनंतर आशिष नेहराची कर्णधार कोहलीवर टीका

गेल्या काही दिवसांपासून विराटवर टीका करण्यात येत आहे.

India vs Australia 2020 | विराट फार आवेशात निर्णय घेतो, गंभीरनंतर आशिष नेहराची कर्णधार कोहलीवर टीका
| Updated on: Dec 01, 2020 | 5:40 PM
Share

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर सलग दोन सामन्यात विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकाही जिकंली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (India Tour पहिल्या सामन्यात 66 तर दुसऱ्या सामन्यात 51 धावांनी पराभव केला. यामुळे ऑस्ट्रेलियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. या दोन्ही सामन्यात टीम इंडियाचे गोलंदाज अपयशी ठरले. तसेच कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दरम्यान आता गौतम गंभीरनंतर टीम इंडियाचा माजी गोलंदाज आशिष नेहराने (Ashish Nehra) कर्णधार विराटवर टीका केली आहे. india vs australia 2020 former india bowler ashish nehra criticizes skipper virat kohli

विराट आवेशात येऊन निर्णय घेतो. तसेच विराटने दुसऱ्या सामन्यात गोलंदाजीमध्ये ऐनवेळेस अनपेक्षित बदल केले. यामुद्द्यावरुन नेहराने विराटवर निशाणा साधला. विराटने काही निर्णय हे फार घाईत घेतले, याचा काहीच फायदा झाला नाही, असं नेहरा म्हणाला. आशिष नेहरा क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होता.

नेहरा काय म्हणाला?

“दुसऱ्या सामन्यात विराटने मोहम्मद शमीला 2 ओव्हर गोलंदाजी करायला दिली. त्यानंतर विराटने नवदीप सैनीला बोलिंगसाठी बोलावलं. दुसऱ्या बाजूनं शमीने गोलंदाजी करावी, अशी इच्छा विराटची होती, हे मी समजू शकतो. परंतु विराटने सामन्याच्या सुरुवातीला यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहचा केवळ 2 ओव्हरसाठीच उपयोग का केला. विराट सातत्याने बोलिंगमध्ये बदल करतोय. विराटकडे गोलंदाजीसाठी केवळ 5 पर्यायच आहेत. विराटने मयंक अग्रवाल आणि हार्दिक पांड्यालाही गोलंदाजीची संधी दिली. मात्र हा निर्णय मैदानात घेतला गेला”, असं नेहरा म्हणाला.

“विराट निर्णय घेण्यास घाई करतोय”

“विराट घाईगडबडीत निर्णय घेतोय. पहिल्या सामन्यात कोहलीचा कॅच सोडला. यानंतरही विराट गडबडीत दिसला. विराटने आपल्या कारकिर्दीत अनेकदा 350 पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. मोठ्या धावांचं पाठलाग करणं हे विराटसाठी नवं नाही. पण विराट 350 नाही तर 475 धावांचं पाठलाग करतोय असं वाटतं. विराट आवेशात येऊन गोलंदाजीमध्ये अनेक बदल करतोय. विराटला गोलंदाजीकडे लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे”, असंही नेहराने म्हटलं.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | विराटला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ‘या’ दिग्गज कर्णधाराच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी

India vs Australia 2020 | विराटवर कर्णधार पदाचा कोणताही दबाव नाही, सलग दुसऱ्या पराभवानंतर टीकेचा धनी झालेल्या कोहलीची हरभजनकडून पाठराखण

India vs Australia 2020 | कोहलीची कॅप्टन्सी समजणे अवघड, गंभीरचा विराटवर हल्लाबोल

india vs australia 2020 former india bowler ashish nehra criticizes skipper virat kohli

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.