AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020 | विराटवर कर्णधार पदाचा कोणताही दबाव नाही, सलग दुसऱ्या पराभवानंतर टीकेचा धनी झालेल्या कोहलीची हरभजनकडून पाठराखण

ऑस्ट्रेलियाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

India vs Australia 2020 | विराटवर कर्णधार पदाचा कोणताही दबाव नाही, सलग दुसऱ्या पराभवानंतर टीकेचा धनी झालेल्या कोहलीची हरभजनकडून पाठराखण
| Updated on: Nov 30, 2020 | 8:07 PM
Share

सिडनी : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 51 धावांनी विजय (India vs Australia 2020) मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली. सलग दोन पराभवानंतर कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) सोशल मीडियावरुन तसेच माजी खेळाडूकडून टीका करण्यात आली. या पराभवांमुळे विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं. दरम्यान टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) विराटच्या मदतीला धावून आला आहे. हरभजनने विराटची पाठराखण केली आहे. there is no pressure on virat kohli for the captaincy said former india player harbhajan singh

हरभजन काय म्हणाला?

“विराटवर कर्णधार पदाचा कोणताही दबाव नाही. कर्णधारपद हे विराटसाठी डोकेदुखी ठरतंय, असं मला वाटत नाही. विराट सर्व आव्हानांसाठी सज्ज असतो. तो सर्व आव्हानांना हसत हसत सामोरा जातो. तो प्रत्येक बाबतीत आघाडीवर आहे. प्रत्येक गोष्टीचं तो नेतृत्व करतो. विराट सर्वांसाठी उत्तम आदर्श आहे”, असं हरभजन म्हणाला. “कर्णधारपदाचा विराटच्या खेळावर परिणाम होत आहे असे मला वाटत नाही. एकटा एक खेळाडू सामना जिंकवू शकत नाही. विजयासाठी सांघिक खेळी महत्वाची असते”, असं हरभजनने नमूद केलं. हरभजन इंडिया टुडेसोबत होता.

हरभजनकडून केएलचं कौतुक

“केएल राहुलने 2 (K L Rahul) सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. केएलची ही कामगिरी पाहून आनंद होतोय”, अशा शब्दात हरभजन केएलचं कौतुक केलं. टीम इंडियाला केएल सारख्या आणखी 2-3 फलंदाजांची आवश्यकता आहे. जे सातत्याने चांगली फलंदाजी करतील. ज्यामुळे विराटवरील दबाव थोड्या प्रमाणात कमी होईल. परिणामी विराट आणखी आक्रमकपणे फलंदाजी करु शकेल, असं हरभजनने म्हटलं.

तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला

या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. हा सामना जिंकून टीम इंडियाचा शेवट गोड करण्याच्या प्रयत्न असणार आहे. या एकदिवसीय मालिकेनंतर 3 टी 20 सामन्यांची आणि 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | कोहलीची कॅप्टन्सी समजणे अवघड, गंभीरचा विराटवर हल्लाबोल

India vs Australia 2020 | अय्यरची निर्णायक विकेट, कोहलीचा अफलातून कॅच, हेनरिक्सने मॅच फिरवली

there is no pressure on virat kohli for the captaincy said former india player harbhajan singh

Follow Us
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर...
Disha Salian Case Update | दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड! हायकोर्टाच्या आदेशानंतर तपास CBIकडे, आता सत्याचा शोध लागणार?
गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा...
Sanjay Raut | गोठवण्याची वेळ आणली कोणी? या चोरांनीच ना?; धनुष्यबाणावरून राऊतांचा शिंदेंवर घणाघात
कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
Kunbi Certificate | जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी कुणबी प्रमाणपत्रांची मोठी आकडेवारी आली समोर
ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा...
मोठी बातमी! फुलंब्रीत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! कोर्टात आज काय घडणार
Shivsena | ठाकरेंच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बॅटिंग! पक्ष आणि चिन्हावर सुप्रीम कोर्टात आज काय घडणार?
काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो...
Ravindra Chavan | काल आलेला पोरगा काहीतरी बोलतो आणि आपण आंदोलन करतो; रवींद्र चव्हाणांचा भाजप युवा मोर्चाला खडेबोल
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!