इथेनॉलचा नेमका वाद काय? गाड्या खरंच निकामी होतायेत? सरकारी धोरण आणि आक्षेपांची A टू Z काहीणी
भारतासाठी इथेनॉल हे केवळ एक पर्यायी इंधन नसून, ते त्याच्या ऊर्जा सुरक्षा धोरणाचा एक भाग आहे. हा देश दरवर्षी अब्जावधी डॉलर्स किमतीचे कच्चे तेल आयात करतो. पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण वाढवल्यास तेलाच्या आयातीवरील त्याचे अवलंबित्व कमी होऊ शकते.

भारतात इथेनॉल सध्या सतत चर्चेत आहे. कधी सरकार पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवण्याची घोषणा करते तर कधी याच्याशी संबंधित निर्णय शेतकरी, साखर कारखाने आणि अन्न सुरक्षा यासंबंधी नवीन वाद निर्माण करतात. १ एप्रिल २०२६ पर्यंत देशभरात E-20 पेट्रोल रोलआउट झाले आहे. देशातील ४८ पेट्रोल पंपांवर E-85 पेट्रोल सुरू झाले असून डिसेंबर २०२६ पर्यंत ते ५०० पंपांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. याच दरम्यान इथेनॉल उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या माल आणि सरकारी निर्णयांवर वादही निर्माण झाला आहे. इथेनॉल म्हणजे काय? function loadTaboolaWidget() { window._taboola = window._taboola || []; var isMobile...
