AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी लग्नाच्या पंधरा वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे. सोशल मीडियावर पोस्ट लिहित दोघांनी चाहत्यांना याबद्दलची माहिती दिली आहे. तसंच लेक जिजाबद्दल दोघांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ - उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय
उर्मिला कानेटकर, आदिनाथ कोठारेImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 16, 2026 | 3:45 PM
Share

घटस्फोटांचं वाढतं प्रमाण हा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. 15 ते 20 वर्षे संसार केल्यानंतर काही जोडपी विभक्त होत आहेत, तर काहींचा संसार काही महिनेही टिकत नाहीये. जेव्हा सेलिब्रिटींच्या बाबतीत असं काही वृत्त समोर येतं, तेव्हा पुन्हा एकदा हा मुद्दा सोशल मीडियावर चर्चत येतो. मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांत लोकप्रिय मानली जाणारी जोडी आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी अखेर घटस्फोट जाहीर केला आहे. गेल्या काही काळापासून या दोघांच्या विभक्त होण्याची कुजबुज दबक्या आवाजात सुरू होती. त्यावर आता दोघांनी शिक्कामोर्तब करत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट लिहित घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. त्याचसोबत दोघांनी त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीबाबतचा मोठा निर्णयसुद्धा सांगितला आहे.

आदिनाथ आणि उर्मिला यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. उर्मिलाला पाहताच क्षणी आदिनाथ तिच्या प्रेमात पडला होता. या प्रेमाचं लग्नात तर रुपांतर झालं. मात्र त्याचा शेवट घटस्फोटात होईल याची कल्पना कोणीच केली नसेल. घटस्फोटाचं नेमकं कारण या दोघांनी सांगितलं नाही. पण ‘चंद्रमुखी’ या चित्रपटापासूनच दोघांमधील दुराव्याची चर्चा होऊ लागली होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा असो किंवा इतर कोणताही क्षणी.. दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांबद्दल काहीही पोस्ट करणं बंद केलं होतं. घटस्फोट हा कधीच कोणासाठी सोपा नसतो. त्यामुळे खूप विचार केल्यानंतर एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने वेगळं होत असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केलं.

आदिनाथ आणि उर्मिलाची पोस्ट-

घटस्फोटानंतर लेक जिजाचं काय होणार, तिचं संगोपन कोण करणार, याविषयीही दोघांनी मिळून निर्णय घेतला आहे. आठ वर्षांच्या जिजासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत, असं त्यांनी पोस्टमध्ये सांगितलं आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला तरी मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत, ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळाला, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचं संगोपन करत आहोत, असं आदिनाथ आणि उर्मिलाने स्पष्ट केलं.

घटस्फोट घेताना अपत्य कोणासोबत राहणार याबाबत मिळून विचार केला जातो आणि तसा निर्णय घेतला जातो. आई आणि वडील दोघांना मिळूनही त्यांच्या मुलाचं किंवा मुलीचं संगोपन करता येतं. अशा केसेसमध्ये मुलगा किंवा मुलगी परिस्थितीनुसार कायमची तिच्या आईकडे किंवा वडिलांकडे किंवा ठराविक दिवसांनी दोघांकडे राहायला असतात. मात्र अनेक महत्त्वाच्या प्रसंगी, शाळा-कॉलेजच्या बाबतीत किंवा इतर खास प्रसंगी आई आणि वडील दोघं एकत्र येऊन त्यांची जबाबदारी पार पाडतात. जिजाला आई आणि वडील या दोघांचं प्रेम मिळालं यासाठी तिचं एकत्र संगोपन म्हणजेच को-पॅरेंटिंग करण्याचा निर्णय आदिनाथ आणि उर्मिलाने घेतला आहे. जिजा लहानपणापासूनच नेटकऱ्यांच्या परिचयाची आहे, कारण आदिनाथ आणि उर्मिला यांनी अनेकदा तिच्यासोबत फोटो, व्हिडीओ, रील्स पोस्ट केले आहेत.

घटस्फोट आणि त्यासंबंधी यापुढे कोणतीही कमेंट किंवा चर्चा करणार नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्याचसोबत नेटकऱ्यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, म्हणून दोघांनीही पोस्टवरील कमेंट्स ‘म्यूट’ (बंद) केले आहेत. म्हणजेच या पोस्टवर कोणीच कमेंट करू शकणार नाही.

Follow Us
इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात दुचाकीची अंत्ययात्रा
Kolhapur App Protest | इथेनॉल पेट्रोलमुळे गाड्यांचा मृत्यू? कोल्हापुरात थेट दुचाकीची अंत्ययात्रा; सरकारविरोधात जोरदार आंदोलन
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा.

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ.

शहरी जेवणात मराठवाड्याच्या बहुगुणी करटोलीचा स्वाद, यंदा रानभाजीच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!

IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा.

IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा