AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा

Paresh Rawal : "माझ्या डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितलय की बिछान्यावर झोपायला जाण्याआधी न्यूज चॅनल बघू नकोस आणि सकाळी उठल्यानंतर दुपारपर्यंत न्यूज पेपर वाचू नकोस. जर, तुला एखादी महत्वाची बातमी हवी असेल, तरी ती स्वत:च तुझ्यापर्यंत येईल"

Paresh Rawal : पाच वर्षात राजकारण का सोडलं? अभिनेते परेश रावल यांनी आता 12 वर्षांनी केला खुलासा
Paresh RawalImage Credit source: social media
| Updated on: Jul 16, 2026 | 4:03 PM
Share

अभिनेते परेश रावल हे हिरो नाहीत, पण त्यांनी ज्या भूमिका केल्या त्यातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:च एक वेगळं स्थान निर्माण केलं. मागच्या अनेक दशकापासून ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. विनोदी अभिनेता, खलनायक, मित्र, वडिल अशा वेगलेगळ्या रोल्समधून त्यांनी स्वत:ची एक छाप उमटवली. त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर कसदार भूमिका सुद्धा साकारल्या. परेश रावल ही व्यक्ती फक्त अभिनय क्षेत्रापुरती मर्यादीत नाही. त्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर सुद्धा परखडपणे भाष्य केलं आहे. त्यांनी सोशल मीडियावर मांडलेल्या मतांमुळे काहीवेळा वाद सुद्धा निर्माण झाले. ‘माझ्या ऑनलाइन उपस्थितीमुळे चांगल्यापेक्षा वाईट जास्त होत होतं’ असं परेश रावल म्हणाले.

नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना परेश रावल त्यांच्या स्वभावाबद्दल व्यक्त झाले. काही टि्वटसबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. ‘टि्वटरवर सक्रीय राहण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर जास्त परिणाम होत होता’ असं ते म्हणाले. विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या स्वभावाबद्दल बोलताना परेश रावल म्हणाले की, ” बघा मला कुठून काही मिळवायचं नाहीय. मला कोणाला खाली पाडायचं नाहीय. मला कुठला लोभ नाहीय. माझ्याकडे जे काही आहे, मला असं वाटतं देवाने मला भरपूर दिलय. त्यामुळे मला कुठला लोभ नाही. म्हणून मी स्पष्टवक्ता आणि प्रामाणिक आहे”

राजकारण का सोडलं?

परेश रावल यांनी राजकारण का सोडलं, त्या बद्दलही सांगितलं. ते 2014 साली गुजरातच्या अहमदाबादमधून निवडून लोकसभेवर गेले होते. पण 2019 साली ते राजकारणातून बाहेर पडले. विकी लालवानीच्या पॉडकास्टमध्ये ते बोलत होते. राजकारणात खूप समर्पण भावनेची गरज असते. अभिनय कायम ठेऊन राजकारण शक्य नव्हतं. म्हणून राजकारणातून बाहेर पडल्याचं परेश रावल यांनी सांगितलं.

सकाळी उठल्यानंतर दुपारपर्यंत न्यूज पेपर वाचू नकोस

‘मानसिक आणि शारिरीक स्वास्थावर परिणाम होत असल्याने मी टि्वटरपासून लांब असतो’ असं परेश रावल यांनी सांगितलं. “मी टि्वटर वापरणं थांबवलय कारण त्याचा माझ्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतोय. त्यामुळे माझं ब्लड प्रेशर वाढतं. माझ्या डॉक्टरांनी मला स्पष्टपणे सांगितलय की बिछान्यावर झोपायला जाण्याआधी न्यूज चॅनल बघू नकोस आणि सकाळी उठल्यानंतर दुपारपर्यंत न्यूज पेपर वाचू नकोस. जर, तुला एखादी महत्वाची बातमी हवी असेल, तरी ती स्वत:च तुझ्यापर्यंत येईल. तुला तिथे बसून स्वत:ला हायपर करण्याची आवश्यकता नाही” असं परेश रावल म्हणाले.

Follow Us
यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये रक्तरंजीत राडा!
Mumbai Local | यावेळी चाकू नाही चक्क लोखंडी... मुंबई लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजीत राडा! काय घडलं?
अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
Jay Pawar | अजितदादांच्या आठवणीत वारकरी भावुक; जय पवार यांनीही काढली आठवण!
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट...
उद्धव ठाकरे दिल्लीला येणार का? CJP संस्थापक अभिजीत दीपकेनं दिलं थेट उत्तर
सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने....
Pankaja Munde | सुनेत्रा पवार पालकमंत्री... पण मीच पालक! पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकारणात नव्या चर्चांना उधाण
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच...
अजित पवारांसह अनेकांवर होता आरोप; कोर्टाचा निर्णय येताच पवार कुटुंबीयांना मोठा दिलासा, नेमकं प्रकरण काय?
वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात....
Sunil Tatkare | वर्षा बंगल्यावरील बैठकीचं गूढ अखेर उलगडलं! तटकरेंनी एकाच वक्तव्यात केला मोठा खुलासा
पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळा
Pandharpur | पंढरपुरात VIP दर्शनावरून वाद! मुनगंटीवार नाराज; गुलाबराव पाटलांना मिळाला ग्रीन सिग्नल; नेमकं घडलं काय?
MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
Devendra Fadnavis | MPSC परिक्षेबाबत महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! ऑगस्ट 2027 पर्यंत...
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील....
TV9 च्या बातमीनंतर रेल्वेप्रशासन खडबडून जागं झालंय; अखेर शेतातील पाणी काढण्यास सुरुवात
थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
Nagesh Ashtikar Photo | थेट अमित शहांसोबतचा.... आष्टिकरांच्या दिल्लीतील फोटोमुळे खळबळ
Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?.

Thalapathy Vijay : थलापती विजय यांचं सरकार संकटात; 2 महिन्यातच समोर सर्वात मोठी अडचण; तामिळनाडूमध्ये काय घडतंय?

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश.

विरार येथील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर चार मुले बुडाली, दोघांना वाचवण्यात यश

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय.

पाहताच क्षणी प्रेम, 15 वर्षांनंतर घटस्फोट, आदिनाथ – उर्मिलाने लेक जिजाबद्दल घेतला मोठा निर्णय

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!.

शरद पवार तेव्हाच पंतप्रधान झाले असते…केंद्रीय मंत्र्याचं थेट विधान; सगळंच सांगून टाकलं!

IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा.

IND vs ENG: कार्डिफमध्ये वनडेत भारताची कामगिरी कशी आहे? 33 सामन्यांची आकडेवारी वाचा

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं.

घराची स्वच्छता करताना सापडली अशी वस्तू; एकाच रात्रीत कुटुंब बनलं श्रीमंत, त्या कागदाने आयुष्यच बदललं