AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs Australia 2020, 2nd Odi | कर्णधार कोहलीची ‘विराट’ कामगिरी, मानाच्या पंगतीत स्थान, ठरला तिसरा भारतीय

विराटने ऑस्ट्रेलियाविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 89 धावांची खेळी केली.

India vs Australia 2020, 2nd Odi | कर्णधार कोहलीची 'विराट' कामगिरी, मानाच्या पंगतीत स्थान, ठरला तिसरा भारतीय
| Updated on: Nov 29, 2020 | 6:57 PM
Share

सिडनी : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही जिंकली. ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. विराटने या सामन्यात विजयी आव्हानाचं पाठलाग करताना झुंजार खेळी केली. विराटने 87 चेंडूत 7 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 89 धावा केल्या.या खेळीसह कोहलीने विराट कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा विराट तिसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. india vs australia 2020 india captain virat kohli became the third indian and overall eighth batsman to complete 22,000 runs in international cricket

काय आहे कामगिरी?

विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 22 हजार धावा पूर्ण करण्याचा कामगिरी केली आहे. विराटने एकूण 418 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो ओव्हरऑल 8 वा तर टीम इंडियाचा तिसराच खेळाडू ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ब्रायन लारा, राहुल द्रविड, जॅक कॅलिस, महिला जयवर्धने, रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर या 7 खेळाडूंनी 22 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे हे सर्व माजी खेळाडू आहेत. विराट 22 हजार धावा करणारा आठवा आणि आजी खेळाडू ठरला आहे.

22  हजारांपेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू

विराटच्या आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या 2 फलंदाजांनाच 22 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचा समावेश आहे. सचिनच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 34 हजार 357 धावा केल्या आहेत. तर राहुल द्रविडने 24 हजार 64 धावा केल्या आहेत.

विराटची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द

विराटने एकूण 418 आंतरराष्ट्रीय सामन्यातील (एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी) 462 डावांमध्ये 56.15 च्या सरासरीने 22 हजार 11 धावा केल्या आहेत. यामध्ये विराटने एकूण 70 शतकं तर 105 अर्धशतकं लगावली आहेत.

तिसरा सामना बुधवारी

दरम्यान ऑस्ट्रेलियाविरोधातील एकदिवसीय मालिकेतील शेवटचा आणि अखेरचा सामना बुधवारी 2 डिसेंबरला खेळण्यात येणार आहे. या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs Australia 2020 | विराट कोहली वन डेमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचकडून कौतुक

India vs Australia 2020 | विराट कोहलीने रचला इतिहास, हा रेकॉर्ड करणारा 9 वा भारतीय खेळाडू

india vs australia 2020 india captain virat kohli became the third indian and overall eighth batsman to complete 22,000 runs in international cricket

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.