AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोहली आणि राहुलची अर्धशतकी खेळी, भारताचा विडींजवर 6 गडी राखून विजय

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात विजय (India vs West Indies T-20) मिळवला.

कोहली आणि राहुलची अर्धशतकी खेळी, भारताचा विडींजवर 6 गडी राखून विजय
| Updated on: Dec 07, 2019 | 12:03 AM
Share

हैदराबाद : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि लोकेश राहुल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात विजय (India vs West Indies T-20) मिळवला. हैदराबादमध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर 6 गडी राखत मात केली (India vs West Indies T-20) आहे. विशेष म्हणजे 3 सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली (India vs West Indies T-20) आहे.

वेस्ट इंडिजच्या टीमने 20 षटकांत 5 विकेट गमावत 207 धावा केल्या आणि भारताला विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य दिले. विंडीजने दिलेल्या 208 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने 18.4 षटकात 4 विकेट गमावत 209 धावा केल्या. यात भारताकडून विराट कोहलीने 50 चेंडूत 94 धावांची खेळी केली. तर लोकेश राहुलने 42 चेंडूत 62 धावा केल्या.

विंडीजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने थोडीसी सावध सुरुवात केली. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा अवघ्या 8 धावा काढून माघारी परतला. यानंतर कोहली आणि राहुलने दुसऱ्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. मात्र 62 धावा करत लोकेश राहुल माघारी परतला. यानंतर ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे काहीशा धावा करत माघारी परतले. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील हा भारताचा सर्वोत्तम धावांचा पाठलाग (India vs West Indies T-20) केला.

दरम्यान वेस्ट इंडीजकडून 2 तर कायरन पोलार्ड आणि शेल्डन कोट्रलने प्रत्येकी 1 विकेट घेतला. वेस्टइंडीजविरोधात भारताचा हा सलग सातवा विजय आहे. या कसोटीतील दुसरा सामना 8 डिसेंबरला तिरुवनंतपुरममध्ये खेळवला जाणार आहे.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर