AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचा टी-20 मध्ये आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव

वेलिंग्टन : अगोदर भारतीय गोलंदाजांची धुलाई आणि नंतर फलंदाजांचं अपयश या दोन्ही कारणांमुळे भारताला टी-20 मध्ये आतापर्यंतच्या सर्वात वाईट पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडने दिलेल्या 220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 139 धावात गारद झाला, ज्यामुळे तब्बल 80 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताचा टी-20 क्रिकेटमधील हा सर्वात मोठा पराभव आहे. कर्णधार रोहित शर्मा […]

भारताचा टी-20 मध्ये आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

वेलिंग्टन : अगोदर भारतीय गोलंदाजांची धुलाई आणि नंतर फलंदाजांचं अपयश या दोन्ही कारणांमुळे भारताला टी-20 मध्ये आतापर्यंतच्या सर्वात वाईट पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडने दिलेल्या 220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 139 धावात गारद झाला, ज्यामुळे तब्बल 80 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताचा टी-20 क्रिकेटमधील हा सर्वात मोठा पराभव आहे.

कर्णधार रोहित शर्मा केवल एक धाव करुन माघारी परतला. त्यानंतर विजय शंकरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. विजय शंकरने शिखर धवनच्या साथीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण शिखर धवन 29 आणि विजय शंकर 27 धावांवर बाद झाले. यानंतर रिषभ पंतही केवळ चार धावा करुन माघारी परतला.

यानंतर आलेल्या धोनीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला साथ देण्यासाठी कुणीही तग धरु शकलं नाही. दिनेश कार्तिक 5, हार्दिक पंड्या 4, भुवनेश्वर कुमार 1 अशा एकेरी धावसंख्येवर सर्व गडी माघारी परतले. अखेर धोनीही 39 धावांवर बाद झाला, ज्यामुळे 19.2 षटकात भारताला फक्त 139 धावा करता आल्या.

त्याआधी भारतीय गोलंदाजांची न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जोरदार धुलाई केली. सीफर्ट 84, कोलिन मुन्रो, 34, केन विल्यम्सन 34 यांनी मोठं योगदान दिलं. याशिवाय खालच्या फळीतल्या फलंदाजांनीही मोलाची भूमिका निभावली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना वेळीच वेसन न घालता आल्याने भारतासमोर मोठी धावसंख्या उभी राहिली.

भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेत चार षटकांमध्ये 47 धावा लुटल्या. दोन विकेट घेणाऱ्या हार्दिक पंड्याचीही धुलाई झाली. त्याने सर्वाधिक 51 धावा दिल्या. खलील अहमदने एक विकेट घेत 48 धावा, यजुवेंद्र चहलने एक विकेट घेत 35 आणि कृणाल पंड्याने एक विकेट घेत 37 धावा लुटल्या.

भारतीय महिला संघाचाही पराभव

दुसरीकडे याच मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध भारतीय महिला संघाचा सामना झाला. या सामन्यात भारतीय महिला संघाचा 23 धावांनी पराभव झाला. स्मृती मंधानाच्या धडाकेबाज सुरुवातीनंतरही उर्वरित नऊ विकेट केवळ 34 धावांमध्ये पडल्या, ज्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. भारतीय महिला संघाची धावसंख्या 11.2 षटकांमध्ये 102/1 अशी होती. पण त्यानंतर केवळ 34 धावा भारतीय महिला संघाने नऊ विकेट गमावल्या.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.