भारताचा टी-20 मध्ये आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव

वेलिंग्टन : अगोदर भारतीय गोलंदाजांची धुलाई आणि नंतर फलंदाजांचं अपयश या दोन्ही कारणांमुळे भारताला टी-20 मध्ये आतापर्यंतच्या सर्वात वाईट पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडने दिलेल्या 220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 139 धावात गारद झाला, ज्यामुळे तब्बल 80 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताचा टी-20 क्रिकेटमधील हा सर्वात मोठा पराभव आहे. कर्णधार रोहित शर्मा […]

भारताचा टी-20 मध्ये आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

वेलिंग्टन : अगोदर भारतीय गोलंदाजांची धुलाई आणि नंतर फलंदाजांचं अपयश या दोन्ही कारणांमुळे भारताला टी-20 मध्ये आतापर्यंतच्या सर्वात वाईट पराभवाला सामोरं जावं लागलं. न्यूझीलंडने दिलेल्या 220 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 139 धावात गारद झाला, ज्यामुळे तब्बल 80 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. भारताचा टी-20 क्रिकेटमधील हा सर्वात मोठा पराभव आहे.

कर्णधार रोहित शर्मा केवल एक धाव करुन माघारी परतला. त्यानंतर विजय शंकरला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं. विजय शंकरने शिखर धवनच्या साथीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण शिखर धवन 29 आणि विजय शंकर 27 धावांवर बाद झाले. यानंतर रिषभ पंतही केवळ चार धावा करुन माघारी परतला.

यानंतर आलेल्या धोनीने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला साथ देण्यासाठी कुणीही तग धरु शकलं नाही. दिनेश कार्तिक 5, हार्दिक पंड्या 4, भुवनेश्वर कुमार 1 अशा एकेरी धावसंख्येवर सर्व गडी माघारी परतले. अखेर धोनीही 39 धावांवर बाद झाला, ज्यामुळे 19.2 षटकात भारताला फक्त 139 धावा करता आल्या.

त्याआधी भारतीय गोलंदाजांची न्यूझीलंडच्या फलंदाजांनी जोरदार धुलाई केली. सीफर्ट 84, कोलिन मुन्रो, 34, केन विल्यम्सन 34 यांनी मोठं योगदान दिलं. याशिवाय खालच्या फळीतल्या फलंदाजांनीही मोलाची भूमिका निभावली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना वेळीच वेसन न घालता आल्याने भारतासमोर मोठी धावसंख्या उभी राहिली.

भुवनेश्वर कुमारने एक विकेट घेत चार षटकांमध्ये 47 धावा लुटल्या. दोन विकेट घेणाऱ्या हार्दिक पंड्याचीही धुलाई झाली. त्याने सर्वाधिक 51 धावा दिल्या. खलील अहमदने एक विकेट घेत 48 धावा, यजुवेंद्र चहलने एक विकेट घेत 35 आणि कृणाल पंड्याने एक विकेट घेत 37 धावा लुटल्या.

भारतीय महिला संघाचाही पराभव

दुसरीकडे याच मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध भारतीय महिला संघाचा सामना झाला. या सामन्यात भारतीय महिला संघाचा 23 धावांनी पराभव झाला. स्मृती मंधानाच्या धडाकेबाज सुरुवातीनंतरही उर्वरित नऊ विकेट केवळ 34 धावांमध्ये पडल्या, ज्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. भारतीय महिला संघाची धावसंख्या 11.2 षटकांमध्ये 102/1 अशी होती. पण त्यानंतर केवळ 34 धावा भारतीय महिला संघाने नऊ विकेट गमावल्या.

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.