AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Aus Test : बीसीसीआयने कसोटीमधून अखेर ‘या’ खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. 17 फेब्रुवारीपासून दिल्लीच्या मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीआधी भारताने एका खेळाडूला रीलीज केलं आहे.

Ind vs Aus Test : बीसीसीआयने कसोटीमधून अखेर 'या' खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता
| Updated on: Feb 12, 2023 | 11:05 PM
Share

मुंबई : भारताने बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील पहिला सामना खिशात घातला आहे. चार सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी जिंकत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. अशातच भारत आणि ऑस्ट्रेलियामधील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. 17 फेब्रुवारीपासून दिल्लीच्या मैदानावर होणाऱ्या दुसऱ्या कसोटीआधी भारताने एका खेळाडूला रीलीज केलं आहे. नागपूरमधील कसोटीमध्येही या खेळाडूला अंतिम अकरामध्ये स्थान मिळालं नव्हतं.

भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला बीसीसीआयने रीलीज केलं आहे. रणजी ट्रॉफीमध्ये केलेल्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर जयदेवने भारतीय कसोटी संघात जागा मिळवली होती. रणजी स्पर्धेमध्ये सौराष्ट्र संघाने अंतिम सामन्यामध्ये धडक मारली आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याला रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळण्यासाठी रीलीज केलं आहे. जयदेव सौराष्ट्रकडून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे.

सेमीफायनलमध्ये सौराष्ट्रने कर्नाटकचा 4 विकेट्स राखून पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. 16 फेब्रुवारीला रणजी स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सौराष्ट्र आणि बंगाल यांच्यात हा सामना होणार आहे. कर्नाटक संघाने पहिल्या डावामध्ये 407 धावा केल्या होत्या. त्यानंतर सौराष्ट्रने 527 धावा करत आघाडी घेतली, दुसऱ्या डावामध्ये कर्नाटकने 234 धावा केल्या होत्या. सौराष्ट्र संघाने 117 धावा करत हा सामना 4 गडी राखून जिंकला.

दरम्यान, जयदेव उनाडकटने 2010 साली कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र एक कसोटी सामना खेळवल्यानंतर त्याला वगळण्यात आलं होतं. जयदेवने हार मानली नाही त्याने 12 वर्षांनंतर पुन्हा भारतीय संघामध्ये जागा मिळवली होती. 2022 मध्ये मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये त्याला संधी देण्यात आली होती.

  • उर्वरित कसोटी सामन्यांचं वेळापत्रक
  • दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, दिल्ली
  • तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा
  • चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

भारत कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया कसोटी संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

Follow Us
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू
मध्यपूर्वेतील युद्धाचा इंधन पुरवठ्यावर परिणाम; ESMA कायदा लागू.
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.