AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातलाय, तरीही टीम इंडिया 15 तारखेला श्रीलंकेमध्ये का जाणार? कारण काय?

IND vs PAK T20 World Cup 2026 मध्ये पाकिस्तानने ठरवलय की भारताविरुद्ध खेळायचं नाही. 15 फेब्रुवारीला कोलंबो मध्ये भारत-पाकिस्तान मॅच होणार आहे. पाकिस्तानी टीम भारताविरुद्ध खेळणार नाहीय, तरीही टीम इंडिया कोलंबोमध्ये का जाणार? कारण काय?

IND vs PAK : वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घातलाय, तरीही  टीम इंडिया 15 तारखेला श्रीलंकेमध्ये का जाणार? कारण काय?
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Feb 02, 2026 | 11:02 AM
Share

IND vs PAK, T20 World Cup : टी20 वर्ल्ड कप 2026 सुरु होण्याआधी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या भूमिकेमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. पाकिस्तान सरकारने कालच घोषणा केली की, वर्ल्ड कपमध्ये त्यांची टीम भारताविरुद्ध मॅच खेळणार नाही. 15 तारखेला कोलंबोत भारत-पाकिस्तान सामना होणार होता. पाकिस्तान टीम श्रीलंकेत त्यांचे उर्वरित सामने खेळेल. पण भारताविरुद्ध खेळणार नाही. याचा अर्थ असा आहे की, टीम इंडियाला वॉकओवर मिळेल. भारताच्या खात्यात न खेळताच 2 पॉइंट जमा होतील. पाकिस्तानने जाहीर केलय की, ते भारताविरुद्ध खेळणार नाहीत. पण टीम इंडिया या सामन्यासाठी श्रीलंकेला नक्की जाणार.

पाकिस्तानने भले भारताविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला असेल. पण टुर्नामेंट दरम्यान टीम इंडिया आयसीसीचे प्रोटोकॉल फॉलो करेल. आयसीसीच्या प्रोटोकॉलनुसार टीम इंडिया या मॅचसाठी श्रीलंकेला जाईल. रिपोर्ट्सनुसार भारतीय टीम 15 फेब्रुवारीला श्रीलंकेत दाखल होईल. टीम तिथे ठरलेल्या शेड्युलनुसार प्रॅक्टिस करेल. प्रेस कॉन्फरन्सही करणार आणि मॅचच्यावेळी स्टेडियममध्ये सुद्धा जाणार. पाकिस्तानी टीम मैदानावर उतरली नाही, तर मॅच रेफरी मॅच रद्द झाल्याचा निर्णय जाहीर करतील. भारतीय टीम या संपूर्ण प्रोसेसची प्रतिक्षा करेल आणि वॉकओवर मिळाल्यानंतर मैदानातून काढता पाय घेईल.

याला मॅच फॉरफिट मानलं जातं

यंदाचा टी 20 वर्ल्ड कप भारत आणि श्रीलंकेने संयुक्तरित्या आयोजित केला आहे. भारताचे बहुतांश सामने भारतात तर पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत होतील. पाकिस्तानने राजकीय कारणांमुळे भारतात खेळायला नकार दिला आहे. आयसीसीने त्यांचे सामने न्यूट्रल वेन्यूवर शिफ्ट केले. भारत-पाकिस्तान सामना कोलंबोच्या प्रेमदासा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये होणार आहे. पाकिस्तानचा बहिष्काराचा निर्णय एकतर्फी आहे. याला मॅच फॉरफिट मानलं जातं. भारताला 2 पॉइंट मिळणं निश्चित आहे.

आपसात मिळून काही तोडगा काढा

पाकिस्तानच्या या निर्णयानंतर आयसीसीचं स्टेटमेंट सुद्धा समोर आलं आहे. आयसीसीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला या निर्णयावर फेरविचार करण्यास आणि आपसात मिळून काही तोडगा काढण्याचा सल्ला दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सूचनेची आम्ही वाट पाहतोय. आयसीसी टुर्नामेंट स्पोर्टिंग प्रामाणिकता, कॉम्पिटिशन आणि निष्पक्षतेवर आधारित असते.

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.