AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : रोहित शर्माने पराभवाचे खापर कोणावर फोडले, दुखापत किती धोकादायक ? जाणून घ्या कॅप्टन काय म्हणाला

रोहित शर्माने पराभवाचे खापर कोणावर फोडले, पाहा काय म्हणाला...

Rohit Sharma : रोहित शर्माने पराभवाचे खापर कोणावर फोडले, दुखापत किती धोकादायक ? जाणून घ्या कॅप्टन काय म्हणाला
Rohit sharmaImage Credit source: twitter
| Updated on: Dec 08, 2022 | 10:11 AM
Share

मुंबई : टीम इंडियाचा (IND) काल बांगलादेश (BAN) टीमने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभव केला. टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव झाल्याने सोशल मीडियावर चाहत्यांनी खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे. बांगलादेश आणि टीम इंडियामध्ये दोन्ही सामने रोमांचक झाले आहेत. कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) मॅच वाचवण्यासाठी षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली. परंतु तरीही टीम इंडियाचा पाच धावांनी पराभव झाला.

रोहित शर्मा, दीपक चाहर आणि कुलदीप सेन हे तीन खेळाडू जखमी झाल्यामुळे पुढच्या मॅचमध्ये खेळणार नाहीत. 10 डिसेंबरला तिसरी एकदिवसीय मॅच होणार आहे. कालच्या मॅचमध्ये रोहित शर्माने कमी चेंडूत अर्धशतक केलं. त्याचबरोबर शेवटच्या अंतिम षटकात टीम इंडियाला 20 धावांची गरज होती. त्यावेळी रोहित शर्माने शेवटच्या चेंडूपर्यंत सामना खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु पाच धावांनी टीम इंडियाचा पराभव झाला.

रोहित शर्माने दुसऱ्या फळीतील गोलंदाजांवरती सगळं पराभवाचं खापर फोडलं आहे. बांगलादेश टीमच्या 100 धावांच्या आतमध्ये सहा विकेट होत्या. त्यानंतर गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करता आली नाही. मधल्या काळात बांगलादेशच्या टीमने चांगल्या धावा केल्या.

त्याचबरोबर “माझ्या बोटाला झालेली जखमी इतकी मोठी नाही. मला वाटलं होतं की फॅक्चर असेल, परंतु बोटाची जखम इतकी गंभीर नसल्यामुळे मी मैदानावर उतरल्याचं रोहित शर्माने सांगितलं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.