AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इकडे आशिया कपसाठी टीमची घोषणा, तिकडे रोहित शर्माला आलं टेन्शन; तडकाफडकी दिला मोठा संदेश!

आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी रोहित शर्माच्या एका कृतीची सगळीकडेच चर्चा होत आहे. एकीकडे भारतीय संघाच्या निवडीबाबत खलबतं सुरू असताना दुसरीकडे रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर लोकांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.

इकडे आशिया कपसाठी टीमची घोषणा, तिकडे रोहित शर्माला आलं टेन्शन; तडकाफडकी दिला मोठा संदेश!
rohit sharma
| Updated on: Aug 19, 2025 | 9:01 PM
Share

Rohit Sharma : आशिया विश्वचषक 2025 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या टीममध्ये कोणाला संधी दिली जाणार आणि कोणाल डच्चू मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा होण्याआधी रोहित शर्माच्या एका कृतीची सगळीकडेच चर्चा होत आहे. एकीकडे भारतीय संघाच्या निवडीबाबत खलबतं सुरू असताना दुसरीकडे रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर लोकांना महत्त्वाचा संदेश दिला आहे.

टीम इंडियात आता कोणाकोणाला संधी?

बीसीसीआयने आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या घोषणानुसार आता टी-20 संघात शुभमन गिलची पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. सप्टेंबर महिन्यात सुरू होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही सूर्यकुमार यादववर सोपवण्यात आली आहे. तर शुभमन गिल हा उपकरर्णधार असेल. तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्णा, जसप्रित बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंह या खेळाडूंचा भारतीय संघात समावेश असेल. त्यामुळे आता ही टीम नेमकी कशी कामगिरी करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

रोहित शर्माला का टेन्शन आलं, काय संदेश दिला?

एकीकडे भारतीय संघाची घोषणा होत होती. तर याच घोषणेआधी रोहित शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक स्टोरी ठेवली. त्याने स्टे सेफ अँड टेक केअर असे म्हटले आहे. म्हणजेच त्याने लोकांना सुरक्षित राहा आणि काळजी घ्या असा संदेश दिलाय. सध्या मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतोय. या पावसामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. लोकलचे काही मार्गदेखील बंद करण्यात आले आहेत. मुंबईतील अनेक रस्ते हे पाण्याखाली गेले असून वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. रोहित शर्मा हा मुळचा मुंबईचा आहे. मुंबईप्रती त्याचे विशेष प्रेम आहे. मुंबईतील सध्याची स्थिती लक्षात घेऊनच त्याने मुंबईकरांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मुंबई, उपनगरातील लोकांनी काळजी घ्यावी, असे त्याने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून म्हटले आहे.

Follow Us
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?
नाशिकच्या मिसळला युद्धाची झळ? मिसळ महागणार?.
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह
सावित्रीबाई फुले विद्यापीठाजवळील डबल डेकर पुलावर प्रश्नचिन्ह.
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला
युद्ध भारताच्या सीमेवर आलंय, तरी षंडाची शांतता; राऊतांचा सरकारवर हल्ला.
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा
राहुल गांधींकडे महत्त्वाची माहिती! संजय राऊतांचा मोठा खुलासा.
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला
शेअर बाजारात वाढ! सेन्सेक्स 500 अकांनी तर निफ्टी 150 अकांनी वधारला.
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप
दादांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनीला वाचवल्याचा राऊतांचा आरोप.
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा
एपस्टिन फालईल हेच युद्धाचं खरं कारण! संजय राऊतांचा मोठा दावा.
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ
युद्धाचा ड्रायफ्रुटच्या बाजाराला फटका; किमतीत 10 ते 5 टक्क्यांची वाढ.
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला
बंगळूरु हॉटेल्स बंद होणार? एलपीजी पुरवठा अचानक थांबला.
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?
एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबईतील हॉटेल्स 2 दिवसांत बंद होणार?.