AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीओएच्या बैठकीत विराट आणि रोहित यांच्यात जुंपली?

मुंबई : भारतीय संघ आगामी विश्वचषकाच्या तयारीसाठी जुंपलेला असतानाच कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील मतमतांतर समोर आलं आहे. विश्वचषक सुरु होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच आयपीएल संपणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये प्रमुख वेगवान गोलंदाजांना आराम दिला जावा असं विराटचं मत आहे. तर हे चूक असल्याचं रोहितचं म्हणणं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमधून वेगवान गोलंदाजांना […]

सीओएच्या बैठकीत विराट आणि रोहित यांच्यात जुंपली?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM
Share

मुंबई : भारतीय संघ आगामी विश्वचषकाच्या तयारीसाठी जुंपलेला असतानाच कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील मतमतांतर समोर आलं आहे. विश्वचषक सुरु होण्यापूर्वी काही दिवस अगोदरच आयपीएल संपणार आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये प्रमुख वेगवान गोलंदाजांना आराम दिला जावा असं विराटचं मत आहे. तर हे चूक असल्याचं रोहितचं म्हणणं आहे.

पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमधून वेगवान गोलंदाजांना आराम द्यावा, अशी कोहलीची इच्छा आहे. हैदराबादमध्ये क्रिकेट प्रशासक समिती (सीओए) च्या बैठकीत ठेवलेल्या या प्रस्तावाला फ्रँचायझी संघांचाही विरोध असेल, असं बोललं जात आहे. शिवाय रोहित शर्मालाही हा सल्ला आवडलेला नाही.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या मते, बैठकीत सीओए प्रमुख विनोद राय यांनी रोहित शर्माला त्याचं मत विचारलं. रोहितने स्पष्ट केलं, की मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफपर्यंत पोहोचला आणि जसप्रीत बुमरा फिट असेल तर त्याला आराम दिला जाणार नाही.

दरम्यान, बैठकीतील दुसऱ्या एका अधिकाऱ्यानेही विराटच्या या सल्ल्यावर आश्चर्य व्यक्त केलं. भारतीय वेगवान गोलंदाजांना संपूर्ण आयपीएलमधून विश्रांती देणं हे अजब आहे. गेल्या काही वर्षांपासून आयपीएल ट्रेनर आणि फिजिओ खेळाडूंच्या व्यस्ततेमुळे भारतीय स्टाफसोबत मिळून काम करत आहेत. पुढच्या वर्षीही हेच होईल आणि गोलंदाजांना सर्व सामने खेळवले जाणार नाहीत, असं या अधिकाऱ्याने सांगितलं.

विराटची विशेषतः भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांना आराम देण्याची इच्छा आहे. कारण, आयपीएल संपल्यानंतर लगेचच विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या विश्वचषकासाठी भारताचे प्रमुख गोलंदाज नव्या दमाने मैदानात उतरावेत, असं विराटचं मत आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...