AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saina Nehwal : संसारात कुठे बिनसलं? सायना नेहवाल स्पष्टच म्हणाली..

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी यावर्षी जुलै महिन्यात जेव्हा घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं, तेव्हा अनेकांना धक्का बसला होता. आता सायनाने त्यामागील कारण मोकळेपणे सांगितलं आहे.

Saina Nehwal : संसारात कुठे बिनसलं? सायना नेहवाल स्पष्टच म्हणाली..
saina nehwal and parupalli kashyapImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 25, 2025 | 12:35 PM
Share

भारतीय बॅडमिंटनचे दोन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांनी जेव्हा लग्न केलं, तेव्हा चाहत्यांना खूप आनंद झाला होता. या दोघांनी त्यांच्या दीर्घकाळाच्या मैत्रीला नवं नाव देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचं लग्न झालं आणि सर्वकाही व्यवस्थित चाललं होतं. परंतु सायनाने जेव्हा अचानक घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं, तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला. लग्नाच्या सात वर्षांनंतर पारुपल्ली कश्यपपासून विभक्त होण्याचा निर्णय का घेतला आणि त्यानंतर पुन्हा नात्याला एक संधी देण्याचं का ठरवलं, याविषयी आता सायना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.

‘फिल्मीयाना’ला दिलेल्या मुलाखतीत सायना म्हणाली, “तो निर्णय आमच्यासाठी खूपच कठीण होता. अर्थातच ते सर्वकाही सोपं नव्हतं. कारण कधी कधी बॅडमिंटननंतर आम्हा दोघांच्या आवडी वेगळ्या वाटायच्या. दोघांची मानसिकता वेगळी असायची. त्यातच करिअरमधील बदलानुसार तणाव वाढला होता. पारुपल्लीच्या निवृत्तीनंतर जेव्हा तो प्रशिक्षक बनला, तेव्हा घरातील वातावरण खूप बदललं होतं.”

“हे साहजिकच होतं, कारण इतकी वर्षे फक्त बॅडमिंटन कोर्टवर घालवली होती आणि अचानक इतक्या वर्षांनंतर खेळ सोडून प्रशिक्षक बनला होता. कश्यप आता कोच आहे, तर आम्हाला वाटलं की कदाचित काहीतरी वेगळं सुरू होईल. परंतु आम्हाला एकमेकांच्या आवडीच विरुद्ध वाटू लागल्या होत्या. कदाचित हळूहळू सर्व ठीक होईल, असं आम्हाला वाटलं होतं. परंतु वेळेनुसार तणाव आणखी वाढतच गेला. त्यामुळे आमच्यात भांडणं वाढत गेली. अशा परिस्थितीत आम्ही अखेर विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता”, असा खुलासा सायनाने केला.

View this post on Instagram

A post shared by SAINA NEHWAL (@nehwalsaina)

घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केल्याच्या महिन्याभरानंतर सायना आणि पारुपल्ली कश्यप यांनी त्यांच्या नात्याला पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेतला. ‘कधीकधी अंतर तुम्हाला उपस्थितीचं मूल्य शिकवतं. आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत’, असं लिहित सायनाने कश्यपसोबतचा फोटो पोस्ट केला होता. सायना आणि पारुपल्ली कश्यपने 14 डिसेंबर 2018 रोजी लग्न केलं होतं. त्यानंतर यावर्षी जुलै महिन्यात त्यांनी विभक्त होत असल्याचं म्हटलं होतं.

सायना नेहवाल ही भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू आहे. तिने 2008 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. तर 38 वर्षीय पारुपल्ली कश्यपने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांची भेट 1997 मध्ये एका बॅडमिंटन कॅम्पमध्ये झाली होती. त्यानंतर 2002 मध्ये त्यांनी हैदराबादमध्ये एकत्र प्रशिक्षण सुरू केलं होतं. तेव्हापासून दोघं एकमेकांना भेटू लागले होते.

Follow Us
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?.

जंतरमंतरवर सीजेपीचं आंदोलन? जागतिक मीडियाने काय म्हटलं?

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या….

CJP protest : मोठी बातमी! विद्यार्थ्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात, थेट मोठी घोषणा, उद्या…

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या.

खरंच की काय? टीम इंडियाच्या हट्टामुळे हा खेळाडू दुखापतग्रस्त! नेमकं काय घडलं ते जाणून घ्या

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल.

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून काही लोक… दिल्लीतील आंदोलनावरून CM फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र