IND vs ENG: संघ जिंकूनही गिलचं दिल काही खुश नाही, मॅचनंतर खुप सुनावलं, नेमकं काय म्हणाला?

भारत आणि इंग्लंड यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना काल पार पडला जो भारतीय संघाने जिंकला. आता यानंतर कर्णधार शुभमन गिलने एक विधान केले त्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

IND vs ENG: संघ जिंकूनही गिलचं दिल काही खुश नाही, मॅचनंतर खुप सुनावलं, नेमकं काय म्हणाला?
shubman gill
| Updated on: Jul 15, 2026 | 8:18 AM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 6 गडी राखून दणदणीत विजय नोंदवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टी-20 मालिकेत 0-4 असा पराभव पत्करल्यानंतर, पाहुण्या भारतीय संघाने अखेर या दौऱ्यावर आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा इंग्लंडने निर्णय घेतल्यानंतर, 258 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने शुभमन गिल (80), वॉशिंग्टन सुंदर (52 नाबाद) आणि अक्षर पटेल (57 नाबाद) यांच्या उत्कृष्ट खेळीच्या जोरावर भारताने 45.2 षटकांतच हे लक्ष्य गाठले.

भारतीय कर्णधार शुभमन गिल सामना जिंकल्यानंतर म्हणाला, “खरं सांगायचं तर, हे आमच्या संघाच्या संयोजनामुळे झालं. आमची गोलंदाज अजून थोडे नवीन आहेत, त्यामुळे आमची फलंदाजी अजूनही आमच्या गोलंदाजीपेक्षा अधिक अनुभवी आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात, आम्हाला प्रथम गोलंदाजी करायची होती, जेणेकरून 320 धावांचे लक्ष्य दिले तरी ते आम्ही गाठू असा आमच्या फलंदाजीवर पूर्ण विश्वास होता.” गिलने सामना जिंकल्यानंतरही गोलंदाजांना एक टोमणा मारला असे पाहायला मिळत आहे.

गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी
गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीचे, विशेषतः मधल्या षटकांमध्ये केलेल्या पुनरागमनाचे कौतुक करताना कर्णधार गिल म्हणाला, “मला वाटते की आम्ही मधल्या षटकांमध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली, ती पाहण्यासारखी होती. पहिल्या 10 षटकांत इंग्लंडच्या संघाने 50 धावाच केल्या होत्या. आम्ही पहिल्या 6-7 षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली, जिथे खेळपट्टीने थोडी मदत केली आणि आम्ही योग्य ठिकाणी गोलंदाजी केली. पॉवरप्लेच्या शेवटी त्यांनी थोडी आक्रमक फलंदाजी सुरू केली, ज्यामुळे आमच्यावर दबाव आला. पण ज्या प्रकारे आम्ही पुनरागमन केले आणि पाच बळी घेतले, ते आमच्यासाठी महत्त्वाचे होते.”

मधल्या खालच्या फळीच्या कामगिरीने आनंदित झालेल्या गिलने सांगितले, “जेव्हा तुम्ही तुमच्या मधल्या आणि खालच्या फळीला अशा धावा करताना आणि संघासाठी सामने जिंकून देताना पाहता, तेव्हा एक कर्णधार आणि अव्वल फळीतील फलंदाज म्हणून तुमचा आत्मविश्वास खूप वाढतो. 2027 चा विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून, दक्षिण आफ्रिकेसारख्या परिस्थितीसाठी गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये अधिक पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी संघ वेगवेगळ्या संयोजनांचे प्रयोग करत आहे.”

Follow Us