AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CAA विरोधात सना गांगुलीची पोस्ट, दादा म्हणतो…

सौरव गांगुलीची मुलगी सनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. यामध्ये लेखक खुशवंत सिंह यांच्या 'The End Of India' या पुस्तकातील एक किस्सा सांगण्यात आला आहे. हा किस्सा सत्ता आणि जातीय भेदभावावर प्रश्न उपस्थित करणारा आहे.

CAA विरोधात सना गांगुलीची पोस्ट, दादा म्हणतो...
| Updated on: Dec 19, 2019 | 4:35 PM
Share

मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशात अनेक ठिकाणी निदर्शनं होत आहेत (CAA). या कायद्याविरोधात आता देशातील प्रत्येक क्षेत्रातील लोक आवाज उठवत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याची मुलगी सना गांगुलीनेही (Sana Ganguly) या कायद्याविरोधात एक पोस्ट लिहिली. या पोस्टवरुन सध्या एक नवा वाद उद्भवला आहे. या प्रकरणी गांगुलीने आपल्या लेकीची बाजू सावरत सध्या राजकीय गोष्टी समजून घेण्यासाठी ती लहान असल्याचं सांगितलं. गांगुलीच्या या वक्तव्याला त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीशी जोडलं जात आहे (Sourav Ganguly Tweet).

सना गांगुलीने काय पोस्ट केली?

सौरव गांगुलीची मुलगी सनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. यामध्ये लेखक खुशवंत सिंह यांच्या ‘The End Of India’ या पुस्तकातील एक किस्सा सांगण्यात आला आहे. हा किस्सा सत्ता आणि जातीय भेदभावावर प्रश्न उपस्थित करणारा आहे. याला नागरिकत्व सुधारणा कायद्याशी जोडण्यात आलं आहे. यामुळे सोशल मीडियावर एक नवा वाद सुरु झाला आहे. याबाबत सौरव गांगुलीने ट्वीट केलं आणि आपल्या मुलीच्या बचावात ‘तिला राजकारण कळत नाही, ती अजून खूप लहान आहे, कृपया तिला राजकारणापासून दूर ठेवा’, असं म्हटलं.

सना गांगुलीचं वय 18 वर्ष आहे. तिचा जन्म 3 नोव्हेंबर 2001 रोजी झाला. कायद्यानुसार सना गांगुली ही सज्ञान आहे आणि स्वत:चे निर्णय घेण्यास सक्षम आहे. पण ज्याप्रकारे सौरव गांगुलीने आपल्या मुलीच्या पोस्टला बालिश असल्याचं सांगितलं, त्यामुळे सौरव गांगुलीवरही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुलीचा बचाव की भविष्याची रणनीती?

गेल्या अनेक काळापासून सौरव गांगुली हे बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचा चेहरा असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सौरव गांगुली आणि भाजपने ही बाब वारंवार फेटाळली आहे. सौरव गांगुली बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यानंतर देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह हे बीसीसीआयचे सचिव झाले. तेव्हापासूनच दादा आणि भाजपमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा आहे.

आज देशात नागरिकत्व सुधारणा कायद्याचा सर्वत्र विरोध होत आहे. मोदी सरकार संविधानविरोधी असल्याचा आरोप विरोधीपक्ष करत आहे. या परिस्थितीत सौरव गांगुलीच्या मुलीकडून सरकारविरोधात पोस्ट सौरव गांगुलीच्या भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी घातक ठरु शकते, असंही बोललं जात आहे.

बंगालमध्ये 2021 ला विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या सौरव गांगुली 9 महिन्यांसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर ते राजकारणात एन्ट्री घेऊ शकतात, अशी जोरदार चर्चा आहे.

पश्चिम बंगालमध्ये सध्या ममता बनर्जी मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधात निवडणुकांची तायरी करत आहे. पण राज्यात त्यांना एका बड्या चेहऱ्याची गरज आहे. राजकीय विश्लेशकांच्या मते सौरव गांगुली तो चेहरा होऊ शकतात. प्रिन्स ऑफ कोलकाता, बंगाल टायगर या नावांनी प्रसिध्द असलेले सौरव गांगुली आजही बंगालमध्ये एक मोठं नाव आहे. याचा फायदा भाजप घेऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.