AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी ड्रामा, टीम इंडिया नाणेफेकीसाठी मैदानात पोहोचली नाही, कारण…

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा टी20 सामना होत आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. या सामन्यासाठी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता टॉस होणार होता. पण टीम इंडिया मैदानात पोहोचली नाही.

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्यापूर्वी ड्रामा, टीम इंडिया नाणेफेकीसाठी मैदानात पोहोचली नाही, कारण...
| Updated on: Jul 11, 2026 | 7:16 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पाचवा सामना टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. कारण भारताने ही मालिका आधाची 3-0 ने गमावली आहे. त्यात एकही विजय न मिळाल्याने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. भारताने या सामन्यात चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहे. तसेच प्लेइंग 11 मध्ये काही बदल असतील असा अंदाजही व्यक्त केला आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार होता. तर नाणेफेकीचा कौल संध्याकाळी 6.30 वाजता होणार होता. मात्र टीम इंडिया मैदानात पोहोचली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे नेमकं काय झालं? याबाबत उत्सुकता वाढली. पण टीम इंडिया ट्राफिकमध्ये अडकल्याने वेळेत पोहोचू शकली नाही. त्यामुळे नाणेफेकीचा कौल होण्यास उशीर झाला.

नाणेफेकीचा कौल कधी होणार?

भारतीय संघ मैदानात संध्याकाळी 6.35 वाजता पोहोचला. त्यामुळे नाणेफेकीला वेळ होणार हे नक्की झालं. पण नेमकं काय झालं? याबाबत सविस्तर काही कळू शकलेलं नाही. पण नाणेफेकीचा कौल उशिरा झाल्याने सामना सुरू होण्यास उशीर होणार हे नक्की झालं. नाणेफेकीचा कौल हा भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.15 वाजता होणार आहे. तर सामना 7.30 वाजता सुरू होईल हे जाहीर करण्यात आलं आहे. भारतीय संघाला मैदानात पोहोचण्यास उशीर झाल्याने हा सामना सुरू होण्यास अर्धा तास सुरू झाला आहे. या सामन्याची वेळ संध्याकाळी 7 वाजताची होती.

सामना सुरू होण्यास वेळ होणार असल्याने इंग्लंडने ही वेळ साधली. त्यांनी मैदानात आपला सराव सुरू ठेवला. इंग्लंडने मालिका आधीच 3-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे हा सामना औपचारिक आहे. त्यात संघावर दडपण नसल्याने इंग्लंडचा संघ टीम इंडियावर भारी पडणार असंच दिसत आहे. दुसरीकडे, टीम इंडियाला शेवटचा सामना जिंकून मालिकेचा शेवट गोड करण्याचं आव्हान असणार आहे. त्याचबरोबर टी20 क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं अव्वल स्थानही धोक्यात आलं आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?