AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेस्ट इंडिजच्या सामन्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघात मोठी उलटापालट? सूर्यकुमार यादव घेणार तो निर्णय, कोणाला संधी…

टी 20 वर्ल्ड कपमध्ये मोठा धमाका बघायला मिळतोय. मात्र, भारतीय क्रिकेट संघ संकटात आहे. भारताला 1 मार्चचा वेस्ट इंडिजसोबतचा सामना कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे. यादरम्यानच काही मोठे बदल होण्याचेही संकेत आहेत.

वेस्ट इंडिजच्या सामन्यापूर्वीच भारतीय क्रिकेट संघात मोठी उलटापालट? सूर्यकुमार यादव घेणार तो निर्णय, कोणाला संधी...
20 World Cup 2026 Indian Cricket Team
| Updated on: Feb 28, 2026 | 9:58 AM
Share

टी 20 वर्ल्ड कपमध्ये आता करो या मरोच्या परिस्थितीमध्ये भारत आहे. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर भारताला मोठा दणका बसला. पुढील दोन सामने भारताला जिंकल्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्यापैकी एक सामना भारताने जिंकला.आता खरी लढत भारतापुढे आहे. वेस्ट इंडिजसोबत भारताचा 1 मार्च 2026 रोजी सामना आहे. कोलकाता येथील ईंडन गार्डन्समध्ये 7 वाजता हा महामुकाबला रंगेल. हा सामना जिंकला की, थेट टिकट टू सेमीफायनलमध्ये जाण्याची मोठी संधी मिळेल. आता या सामन्यापूर्वी काही मोठे बदल संघात होतील, असे सांगितले जाते. गोलंदाजांमध्ये बदल होण्याचे संकेत आहेत. झिम्बाब्वे विरोधातील सामना जिंकल्यानंतरही सूर्यकुमार यादव याने चिंता व्यक्त केली होती.

शिवम दुबे याने 2 ओव्हर्समध्ये तब्बल 47 धावा दिल्या. वरूण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांचाही गेम काही खास राहिला नाही. सध्याच्या परिस्थितीला टीम सेट असली तरीही काही बदल केले जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. काही सामना तितका जास्त महत्वाचा आहे. तिलक वर्मा याने झिम्बाम्वे विरूद्धच्या सामनात 16 बॉलमध्ये 44 रन बनवून आल्या फॉर्मबद्दल संकेत दिले. अभिषेक,संजू सॅमसन यांच्या पार्टनरशिपने झिम्बाब्वे विरोधातील सामन्यात चांगले प्रदर्शन केले.

रिंकु सिंग, सुंदर वॉशिंग्टन, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव प्लेइंग 11 च्या बाहेर आहेत. मात्र, वेळ पडली तर काही बदल होऊ शकतात. कारण भारतीय क्रिकेट संघाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना जिंकायचा आहे. संघ व्यवस्थापकांना संघात सध्याच्या स्थितीला कोणतेही बदल करण्याची इच्छा नसली तरीही काही निर्णय वेळेनुसार घेतले जाऊ शकतात. 11 चा संघ सध्या सेट आहे.

सध्या सर्वात मोठा प्रश्न आहे की, जर भारत वेस्ट इंडिज सामना जर पावसामुळे रद्द झाला तर नक्की काय समीकरण असणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना खेळला जावा हीच भारताची भूमिका असणार आहे. कारण जर पावसामुळे सामना झाला नाही तर याचा फटका थेट भारताला बसेल नेट रनरेटनुसार, वेस्ट इंडिज थेट सेमीफायनलमध्ये जाईल.

Follow Us
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी
लाडकी बहिणींची चिंताच मिटली, शिंदेंनी दिली Good News, योजनेबाबत मोठी.
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरणी आणखी एकाची धरपकड, अटकेचं का.
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक
धक्कादायक! सहा महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता, भाजप नेत्याचे खळबळजनक.
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,
अक्षय तृतीयानिमित्त सिद्धिविनायकमध्ये बाप्पाच्या दागिन्यांच्या लिलाव,.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांचे डोळे आतुर,.
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि
महिला आरक्षणावरुन दमानियांनी सत्ताधारी पक्षाला घेरलं, थेट फडवीसांना वि.
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्
राऊतांच्या वक्तव्यावर संजय शिरसाटांची जोरदार टीका; थेट म्हणाले, 'दुसऱ्.
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?
मोठी बातमी! भोंदू खरातचा मोबाईल डेटा रिकव्हर, नेमकं काय आलं समोर?.
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार
महापौर रितू तावडेंकडून काँग्रेसचा निषेध, काळी साडी नेसून सभेत येणार.
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ
काँग्रेसशिवाय देशाला योग्य नेतृत्व कोणी करूच शकत नाही; संजय राऊतांनी भ.