AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या बैठकीतही शेतकरी आंदोलनाची चर्चा, प्रत्येक खेळाडूने मत मांडलं : विराट कोहली

शेतकरी आंदोलनाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने या मुद्द्यावर ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे (Virat Kohli says we discuss on farmers protest in team meeting)

टीम इंडियाच्या बैठकीतही शेतकरी आंदोलनाची चर्चा, प्रत्येक खेळाडूने मत मांडलं : विराट कोहली
virat Kohli
| Updated on: Feb 04, 2021 | 7:26 PM
Share

मुंबई : शेतकरी आंदोलनाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने या मुद्द्यावर ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर क्रिकेट विश्वातील आणखी काही दिग्गजांनी या विषयावर ट्विट केलं आहे. या सर्व घडामोडी घडत असताना टीम इंडियाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाल्याची माहिती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिली. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याबाबत रणनिती आखण्याबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती (Virat Kohli says we discuss on farmers protest in team meeting).

उद्यापासून सुरु होणाऱ्या चेन्नई टेस्टच्या अगोदर टीम इंडियाची बैठक झाली. या बैठकीत शेतकरी आंदोलनावरही चर्चा झाली, असं विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितलं. चेन्नई टेस्टच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी टीम इंडियाची व्हर्चूअल पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शेतकरी आंदोलनाबाबत विराटला प्रश्न विचारला असता, त्याने याबाबत सविस्तर माहिती दिली (Virat Kohli says we discuss on farmers protest in team meeting).

नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या विषयावर टीम इंडियाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी सर्वच खेळाडूंनी आपापले विचार मांडले, असं विराट कोहलीने सांगितलं. विराट कोहलीने याआधी शेतकरी आंदोलनावर ट्विट करुन आपली भूमिका मांडली होती.

मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकजूट राहिले पाहिजे. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व पक्षांमध्ये शांततेचा तोडगा निघेल जेणेकरून शांतता राहील आणि सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ शकतील, असं ट्विट विराट कोहलीने केलं.

सचिन तेंडुलकरचं ट्विट

भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.

संबंधित बातम्या:

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

Farmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.