AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाच्या बैठकीतही शेतकरी आंदोलनाची चर्चा, प्रत्येक खेळाडूने मत मांडलं : विराट कोहली

शेतकरी आंदोलनाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने या मुद्द्यावर ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे (Virat Kohli says we discuss on farmers protest in team meeting)

टीम इंडियाच्या बैठकीतही शेतकरी आंदोलनाची चर्चा, प्रत्येक खेळाडूने मत मांडलं : विराट कोहली
virat Kohli
| Updated on: Feb 04, 2021 | 7:26 PM
Share

मुंबई : शेतकरी आंदोलनाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. क्रिकेटचा देव म्हणून ख्याती असलेला माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने या मुद्द्यावर ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. त्यानंतर क्रिकेट विश्वातील आणखी काही दिग्गजांनी या विषयावर ट्विट केलं आहे. या सर्व घडामोडी घडत असताना टीम इंडियाच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाल्याची माहिती भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिली. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याबाबत रणनिती आखण्याबाबत ही बैठक आयोजित करण्यात आली होती (Virat Kohli says we discuss on farmers protest in team meeting).

उद्यापासून सुरु होणाऱ्या चेन्नई टेस्टच्या अगोदर टीम इंडियाची बैठक झाली. या बैठकीत शेतकरी आंदोलनावरही चर्चा झाली, असं विराट कोहलीने पत्रकार परिषदेत सांगितलं. चेन्नई टेस्टच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी टीम इंडियाची व्हर्चूअल पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शेतकरी आंदोलनाबाबत विराटला प्रश्न विचारला असता, त्याने याबाबत सविस्तर माहिती दिली (Virat Kohli says we discuss on farmers protest in team meeting).

नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. या विषयावर टीम इंडियाच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी सर्वच खेळाडूंनी आपापले विचार मांडले, असं विराट कोहलीने सांगितलं. विराट कोहलीने याआधी शेतकरी आंदोलनावर ट्विट करुन आपली भूमिका मांडली होती.

मतभेदांच्या या काळात आपण सर्वजण एकजूट राहिले पाहिजे. शेतकरी हा आपल्या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि मला खात्री आहे की सर्व पक्षांमध्ये शांततेचा तोडगा निघेल जेणेकरून शांतता राहील आणि सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ शकतील, असं ट्विट विराट कोहलीने केलं.

सचिन तेंडुलकरचं ट्विट

भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये. भारतासाठी काय चांगलं आहे, हे येथील नागरिकांना कळतं आणि ती गोष्ट त्यांनीच ठरवावी. देश हा एकसंध राहिला पाहिजे, असे ट्विट सचिन तेंडुलकर याने केले आहे.

संबंधित बातम्या:

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

Farmer Protest: भारतासाठी काय चांगलं हे आम्हाला कळतं, बाहेरच्यांनी नाक खुपसू नये: सचिन तेंडुलकर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.