AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup:’तुम्ही फक्त त्यांच्याकडूनच अपेक्षा करता जे चांगले करू शकतात, गौतम गंभीरची टीम इंडियावर टीका

उद्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात फायनल मॅच होणार आहे. दोन्ही टीम मैदानात कसून सराव करीत आहेत.

T20 World Cup:'तुम्ही फक्त त्यांच्याकडूनच अपेक्षा करता जे चांगले करू शकतात, गौतम गंभीरची टीम इंडियावर टीका
Gautam Gambhir
| Updated on: Nov 12, 2022 | 11:25 AM
Share

मुंबई : टीम इंडियाने (Team India) विश्वचषक स्पर्धेच्या (T20 World Cup 2022) सेमीफायनलमध्ये खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर सडकून टीका होत आहे.  इंग्लंडविरुद्ध (ENG) लाजीरवाणा पराभव झाल्यापासून टीम इंडियातील खेळाडूंची असंख्य मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. ज्या खेळाडूंनी विश्वचषक स्पर्धेत चांगली खेळी केली नाही त्या खेळाडूंवर गौतम गंभीर याने सुद्धा जोरदार टीका केली आहे. विशेष म्हणजे 2007 साली टीम इंडियाने विश्वचषक जिंकला होता.

टीम इंडियाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने जोरदार टीका केली आहे. तो म्हणतोय, “तुम्ही फक्त त्यांच्याकडूनच अपेक्षा करता जे चांगले करू शकतात. जे चांगली कामगिरी करत नाहीत, त्यांच्याकडे अपेक्षा करणं सुद्धा अत्यंत चुकीचं आहे.” असं गंभीरने सोशल मीडियावर लिहिलं आहे.

विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियातील अनेक खेळाडूंना चांगली कामगिरी करता आलेली नाही. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाला महत्त्वपुर्ण खेळी करता आलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे.

सेमीफायनलच्या मॅचमध्ये टीम इंडियाच्या फलंदाजांनी सुरुवात अधिक निराशाजनक केली. केएल राहून झटपट बाद झाला, त्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. एकामागून एक खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतला अशी टीम इंडियाची स्थिती होती. हार्दिक पांड्याने अंतिम ओव्हरमध्ये धुवाधार खेळी केली, त्यामुळे टीम इंडियाची धावसंख्या 169 झाली होती.

उद्या पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात फायनल मॅच होणार आहे. दोन्ही टीम मैदानात कसून सराव करीत आहेत.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.