AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिकामा मोबाईल बॉक्स म्हणजे ‘कचरा’ नव्हे, ‘खजिना’ आहे! फक्त असा करा त्याचा उपयोग

स्मार्टफोन घेतल्यावर अनेकजण बॉक्स सरळ फेकून देतात. पण हा बॉक्स काही फक्त शोभेचा नसतो, तर त्याचा उपयोग अनेक महत्वाच्या कामांसाठी होतो. स्मार्टफोन बॉक्स का ठेवावा हे जाणून घ्या.

रिकामा मोबाईल बॉक्स म्हणजे ‘कचरा’ नव्हे, ‘खजिना’ आहे! फक्त असा करा त्याचा उपयोग
SmartphoneImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: May 20, 2025 | 2:18 AM
Share

नवीन स्मार्टफोन घेतला की सगळ्यांचं लक्ष फोन आणि त्याच्या फीचर्सवर असतं. पण बॉक्स मधून फोन बाहेर काढला की मग तो बॉक्स कचऱ्याच्या डब्यात जातो. चार्जर, केबल, इअरफोन आणि मॅन्युअल काढलं की बॉक्सचं काय करायचं, असा विचार अनेकांचा असतो. पण थांबा! हा बॉक्स फक्त पॅकेजिंगसाठी नाही. फोनच्या सुरक्षेपासून ते पर्यावरण संरक्षणापर्यंत हा बॉक्स अनेक कामं करतो. चला, जाणून घेऊ स्मार्टफोनच्या रिकाम्या बॉक्सचं महत्त्व आणि त्याचे फायदे.

स्मार्टफोनच्या बॉक्सचे उपयोग

1. स्मार्टफोनचा बॉक्स फोन आणि त्याच्या सामानाला सुरक्षित ठेवण्याचा उत्तम पर्याय आहे. फोन वापरत नसाल तेव्हा तो डब्यात ठेवा. यामुळे धूळ, ओरखडे आणि इतर नुकसान टळतं. प्रवासात फोन आणि चार्जर एकत्र ठेवायचं असेल, तर हा बॉक्स खूप उपयोगी ठरतो. विशेषतः महागड्या फोनसाठी हा बॉक्स संरक्षक कवचासारखा काम करतो.

2. भविष्यात फोन विकायचा असेल, तर त्याचा बॉक्स आणि सर्व सामान असणं फायदेशीर ठरतं. डब्यासह फोन विकला तर खरेदीदाराला विश्वास वाटतो. यातून फोनची चांगली काळजी घेतल्याचंही दिसतं. बाजारात बॉक्ससह फोनला जास्त किंमत मिळते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बॉक्ससह फोनला प्रीमियम डिव्हाइस मानलं जातं.

3. फोनसोबत येणारं चार्जर, केबल, इअरफोन आणि मॅन्युअल अनेकदा हरवतं. पण बॉक्समध्ये हे सगळं एकत्र ठेवलंत, तर गरज पडल्यावर लगेच सापडतं. फोनचं बिलही या डब्यात ठेवता येतं. वॉरंटी किंवा दुरुस्तीसाठी बिल आणि बॉक्स असणं उपयुक्त ठरतं. यामुळे तुमचा वेळ आणि त्रास वाचतो.

4. आजकाल अनेक कंपन्या रिसायकल करता येणारे बॉक्स बनवतात. बॉक्स फेकण्याऐवजी त्याचा पुनर्वापर केला तर पर्यावरणाची हानी कमी होते. कचऱ्याचं प्रमाण कमी करण्यासाठी हा एक छोटं पण महत्त्वाचा पाऊल आहे. काही कंपन्या डबे परत घेऊन त्यांचा पुनर्वापर करतात, ज्यामुळे कागद आणि प्लॅस्टिकचा वापर कमी होतो.

5. कोणाला स्मार्टफोन भेट द्यायचा असेल, तर त्याचा मूळ बॉक्स गिफ्टला खास बनवतो. बॉक्ससह फोन देणं जास्त आकर्षक आणि प्रीमियम वाटतं. यामुळे भेटवस्तूचा प्रभाव वाढतो. सणासुदीला किंवा खास प्रसंगी बॉक्ससह फोन भेट देणं उत्तम ठरतं.

स्मार्टफोनचे बॉक्स बनवण्यासाठी कागद, कार्डबोर्ड आणि काही प्रमाणात प्लॅस्टिक लागतं. हे बॉक्स कचऱ्यात फेकले तर पर्यावरणाला हानी पोहोचते. पण रिसायकलिंगद्वारे यांचा पुनर्वापर करता येतो. सॅमसंग, ॲपल आणि वनप्लससारख्या कंपन्या पर्यावरणपूरक बॉक्स बनवतात, जे 85-90% रिसायकल करता येणारे असतात. काही कंपन्या बॉक्स परत घेऊन त्यापासून नवीन उत्पादनं बनवतात. भारतात दरवर्षी सुमारे 15 कोटी स्मार्टफोन विकले जातात. जर प्रत्येक बॉक्स रिसायकल झाला, तर कचऱ्याचं प्रमाण खूप कमी होईल.

बॉक्सचा पुनर्वापर कसा कराल?

  • स्मार्टफोनचा बॉक्स फक्त फोन ठेवण्यासाठीच नाही, तर इतरही अनेक कामांसाठी वापरता येतो.
  • छोट्या वस्तू, दागिने, स्टेशनरी किंवा इलेक्ट्रॉनिक सामान ठेवण्यासाठी बॉक्स वापरा.
  • बॉक्सला रंगवून किंवा सजावटी कागद लावून घर सजवता येतं.
  • बॉक्समध्ये माती आणि छोटी रोपं लावून मिनी प्लांटर्स बनवता येतात.
  • स्थानिक रिसायकलिंग केंद्रात बॉक्स द्या, जेणेकरून त्याचा पुनर्वापर होईल.
  • बॉक्सपासून पेन स्टँड, गिफ्ट बॉक्स किंवा शेल्फ बनवता येतं.

स्मार्टफोनचा बॉक्स तुमचा पैसाही वाचवू शकतो. फोन विकताना बॉक्ससह विकला तर 10-20% जास्त किंमत मिळते. उदाहरणार्थ, 30,000 रुपयांचा फोन बॉक्ससह विकला तर 3,000-5,000 रुपये जास्त मिळू शकतात. दुरुस्ती किंवा वॉरंटी दाव्यासाठी बॉक्सतील मॅन्युअल आणि बिल उपयुक्त ठरतं. काही दुकानदार बॉक्ससह फोन दुरुस्तीवर सवलत देतात.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.