AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिकामा मोबाईल बॉक्स म्हणजे ‘कचरा’ नव्हे, ‘खजिना’ आहे! फक्त असा करा त्याचा उपयोग

स्मार्टफोन घेतल्यावर अनेकजण बॉक्स सरळ फेकून देतात. पण हा बॉक्स काही फक्त शोभेचा नसतो, तर त्याचा उपयोग अनेक महत्वाच्या कामांसाठी होतो. स्मार्टफोन बॉक्स का ठेवावा हे जाणून घ्या.

रिकामा मोबाईल बॉक्स म्हणजे ‘कचरा’ नव्हे, ‘खजिना’ आहे! फक्त असा करा त्याचा उपयोग
SmartphoneImage Credit source: Tv9 Bharatvarsh
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: May 20, 2025 | 2:18 AM
Share

नवीन स्मार्टफोन घेतला की सगळ्यांचं लक्ष फोन आणि त्याच्या फीचर्सवर असतं. पण बॉक्स मधून फोन बाहेर काढला की मग तो बॉक्स कचऱ्याच्या डब्यात जातो. चार्जर, केबल, इअरफोन आणि मॅन्युअल काढलं की बॉक्सचं काय करायचं, असा विचार अनेकांचा असतो. पण थांबा! हा बॉक्स फक्त पॅकेजिंगसाठी नाही. फोनच्या सुरक्षेपासून ते पर्यावरण संरक्षणापर्यंत हा बॉक्स अनेक कामं करतो. चला, जाणून घेऊ स्मार्टफोनच्या रिकाम्या बॉक्सचं महत्त्व आणि त्याचे फायदे.

स्मार्टफोनच्या बॉक्सचे उपयोग

1. स्मार्टफोनचा बॉक्स फोन आणि त्याच्या सामानाला सुरक्षित ठेवण्याचा उत्तम पर्याय आहे. फोन वापरत नसाल तेव्हा तो डब्यात ठेवा. यामुळे धूळ, ओरखडे आणि इतर नुकसान टळतं. प्रवासात फोन आणि चार्जर एकत्र ठेवायचं असेल, तर हा बॉक्स खूप उपयोगी ठरतो. विशेषतः महागड्या फोनसाठी हा बॉक्स संरक्षक कवचासारखा काम करतो.

2. भविष्यात फोन विकायचा असेल, तर त्याचा बॉक्स आणि सर्व सामान असणं फायदेशीर ठरतं. डब्यासह फोन विकला तर खरेदीदाराला विश्वास वाटतो. यातून फोनची चांगली काळजी घेतल्याचंही दिसतं. बाजारात बॉक्ससह फोनला जास्त किंमत मिळते. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर बॉक्ससह फोनला प्रीमियम डिव्हाइस मानलं जातं.

3. फोनसोबत येणारं चार्जर, केबल, इअरफोन आणि मॅन्युअल अनेकदा हरवतं. पण बॉक्समध्ये हे सगळं एकत्र ठेवलंत, तर गरज पडल्यावर लगेच सापडतं. फोनचं बिलही या डब्यात ठेवता येतं. वॉरंटी किंवा दुरुस्तीसाठी बिल आणि बॉक्स असणं उपयुक्त ठरतं. यामुळे तुमचा वेळ आणि त्रास वाचतो.

4. आजकाल अनेक कंपन्या रिसायकल करता येणारे बॉक्स बनवतात. बॉक्स फेकण्याऐवजी त्याचा पुनर्वापर केला तर पर्यावरणाची हानी कमी होते. कचऱ्याचं प्रमाण कमी करण्यासाठी हा एक छोटं पण महत्त्वाचा पाऊल आहे. काही कंपन्या डबे परत घेऊन त्यांचा पुनर्वापर करतात, ज्यामुळे कागद आणि प्लॅस्टिकचा वापर कमी होतो.

5. कोणाला स्मार्टफोन भेट द्यायचा असेल, तर त्याचा मूळ बॉक्स गिफ्टला खास बनवतो. बॉक्ससह फोन देणं जास्त आकर्षक आणि प्रीमियम वाटतं. यामुळे भेटवस्तूचा प्रभाव वाढतो. सणासुदीला किंवा खास प्रसंगी बॉक्ससह फोन भेट देणं उत्तम ठरतं.

स्मार्टफोनचे बॉक्स बनवण्यासाठी कागद, कार्डबोर्ड आणि काही प्रमाणात प्लॅस्टिक लागतं. हे बॉक्स कचऱ्यात फेकले तर पर्यावरणाला हानी पोहोचते. पण रिसायकलिंगद्वारे यांचा पुनर्वापर करता येतो. सॅमसंग, ॲपल आणि वनप्लससारख्या कंपन्या पर्यावरणपूरक बॉक्स बनवतात, जे 85-90% रिसायकल करता येणारे असतात. काही कंपन्या बॉक्स परत घेऊन त्यापासून नवीन उत्पादनं बनवतात. भारतात दरवर्षी सुमारे 15 कोटी स्मार्टफोन विकले जातात. जर प्रत्येक बॉक्स रिसायकल झाला, तर कचऱ्याचं प्रमाण खूप कमी होईल.

बॉक्सचा पुनर्वापर कसा कराल?

  • स्मार्टफोनचा बॉक्स फक्त फोन ठेवण्यासाठीच नाही, तर इतरही अनेक कामांसाठी वापरता येतो.
  • छोट्या वस्तू, दागिने, स्टेशनरी किंवा इलेक्ट्रॉनिक सामान ठेवण्यासाठी बॉक्स वापरा.
  • बॉक्सला रंगवून किंवा सजावटी कागद लावून घर सजवता येतं.
  • बॉक्समध्ये माती आणि छोटी रोपं लावून मिनी प्लांटर्स बनवता येतात.
  • स्थानिक रिसायकलिंग केंद्रात बॉक्स द्या, जेणेकरून त्याचा पुनर्वापर होईल.
  • बॉक्सपासून पेन स्टँड, गिफ्ट बॉक्स किंवा शेल्फ बनवता येतं.

स्मार्टफोनचा बॉक्स तुमचा पैसाही वाचवू शकतो. फोन विकताना बॉक्ससह विकला तर 10-20% जास्त किंमत मिळते. उदाहरणार्थ, 30,000 रुपयांचा फोन बॉक्ससह विकला तर 3,000-5,000 रुपये जास्त मिळू शकतात. दुरुस्ती किंवा वॉरंटी दाव्यासाठी बॉक्सतील मॅन्युअल आणि बिल उपयुक्त ठरतं. काही दुकानदार बॉक्ससह फोन दुरुस्तीवर सवलत देतात.

Follow Us
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार