AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलईडी बल्ब की ट्यूब लाइट कोणता पर्याय जास्त वीज वाचवतो? वाचा सविस्तर

घरातील लाईटचं बिल वाढतंय आणि तुम्हीही विचार करत असाल मग आता बल्ब बदलावा की ट्यूब लाइट यापैकी कोणता पर्याय निवडावा? दिसायला दोन्ही सारखेच वाटतात, पण वीज वापर आणि खर्चाच्या बाबतीत यांच्यात मोठा फरक आहे. चला, सोप्या भाषेत समजून घेऊया कोणता पर्याय जास्त फायदेशीर आहे.

एलईडी बल्ब की ट्यूब लाइट कोणता पर्याय जास्त वीज वाचवतो? वाचा सविस्तर
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: May 11, 2025 | 4:09 PM
Share

वीज बिल वाढलं की आपण कमी वीज खाणारी उपकरणं शोधतो. पण चुकून काही उपकरणं घरी आणतो आणि बिल कमी होण्याऐवजी वाढतं. घरात लावलेल्या लाइट्सचा यात मोठा वाटा असतो. म्हणूनच एलईडी बल्ब आणि ट्यूब लाइट यापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते वाचा…

वीजेचा वापर कोण जास्त करतो ?

एलईडी बल्ब ट्यूब लाइटच्या तुलनेत खूप कमी वीज खातात. कारण एलईडी बल्ब 80-90% ऊर्जा प्रकाशात बदलतात आणि फक्त 10-20% ऊर्जा उष्णतेत जाते. पण फ्लूरोसेंट ट्यूब लाइट्स बरीचशी वीज उष्णता निर्माण करण्यात खर्च करतात. उदाहरणच घ्यायचं तर, 9 वॅटचा एलईडी बल्ब 40 वॅटच्या ट्यूब लाइटइतकी रोशनी देतो, पण वीज पाचपट कमी खातो. ट्यूब लाइट्सना सुरू होण्यासाठी काही सेकंद लागतात. कधी त्या टिमटिमतात. एलईडी बल्ब लगेच सुरू होतात आणि स्थिर प्रकाश देतात. मग ते घर, ऑफिस की दुकान असो, एलईडी बल्ब सोयीचे ठरतात.

खर्च आणि टिकाऊपणा कोणात आहे जास्त ?

एलईडी बल्बची किंमत ट्यूब लाइटपेक्षा किंचित जास्त असते. पण दीर्घकाळ पाहिलं तर एलईडी बल्ब स्वस्त ठरतात. कारण त्यांचं आयुष्य 25,000 ते 50,000 तास असतं. म्हणजे एकदा लावलेला बल्ब 10-15 वर्षं सहज टिकतो. ट्यूब लाइटचं आयुष्य 6,000 ते 15,000 तास असतं. त्यामुळे त्या वारंवार बदलाव्या लागतात. एलईडी बल्ब मजबूत असतात. ते सहज तुटत नाहीत. ट्यूब लाइट्स काचेच्या असतात आणि त्यात पारा असतो. त्या तुटल्या तर पर्यावरणाला हानी होते. एलईडी बल्ब पूर्णपणे पुनर्वापरयोग्य असतात आणि त्यात हानिकारक रसायनं नसतात.

पर्यावरणाला फायदा

एलईडी बल्ब पर्यावरणासाठी चांगले आहेत. कमी वीज वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होतं. एका अंदाजानुसार, सर्वांनी एलईडी बल्ब वापरले तर दरवर्षी लाखो टन कार्बन डायऑक्साइड वाचेल. ट्यूब लाइट्समधील पारा पर्यावरणाला हानी पोहोचवतो. त्या तुटल्या तर पारा माती किंवा पाण्यात मिसळतो. यामुळे माणसांसह प्राण्यांनाही धोका निर्माण होतो. एलईडी बल्ब कमी उष्णता देतात. त्यामुळे खोली थंड राहते आणि वातानुकूलनाचा खर्च वाचतो. ट्यूब लाइट्स जास्त उष्णता निर्माण करतात, त्यामुळे खोलीचं तापमान वाढतं.

कोणता पर्याय निवडावा?

वॅटेजवर बरंच काही अवलंबून असतं. 100 वॅटचा बल्ब 40 वॅटच्या ट्यूब लाइटपेक्षा जास्त वीज खाईल. पण सामान्यपणे एलईडी बल्बच कमी वीज खातात. बाजारात 5 ते 15 वॅटचे एलईडी बल्ब मिळतात. ते 20-40 वॅटच्या ट्यूब लाइटइतकीच रोशनी देतात. लहान खोल्यांसाठी एलईडी बल्ब पुरेसे आहेत. मोठ्या जागांसाठी, जसं ऑफिस किंवा दुकान, एलईडी ट्यूब लाइट्स चांगल्या ठरतात. कारण त्या जास्त क्षेत्र व्यापतात.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.