AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोनवर बोलताना वापरा की इंटरनेट; सेटिंगमध्ये करा असा बदल

Internet : मोबाईलवर कॉल आला तर इंटरनेट बंद पडते. त्यामुळे एखादे ऑनलाईन काम असेल, एखादी फाईल, फोटो पाठवायचा असेल तर तो कॉल कट करुन पाठवावा लागतो. त्यात कार्यालयीन अत्यंत जरुरी काम असेल तर नाहक खोळंबा होतो, या साध्या ट्रिकने तुम्ही ही अडचण सोडवू शकता.

फोनवर बोलताना वापरा की इंटरनेट; सेटिंगमध्ये करा असा बदल
इंटरनेट राहिल सुरु
| Updated on: Apr 23, 2024 | 3:32 PM
Share

मोबाईलवर कॉल आला तर इंटरनेट बंद पडते हा नेहमीचाच अनुभव असतो. अनेकदा फोन बोलताना काही फाईल, फोटो पाठवणे गरजेचे असते. अशावेळी मोठी पंचाईत होते. फोन कट करुन थोडावेळ थांबल्यानंतर शेअरिंग होते. ऑनलाईन काही चेक करायचे असेल तर कॉलिंग दरम्यान ही गोष्ट शक्य होत नाही. ऑनलाईन व्यवहार करताना पण ही अडचण येते. पण ही सेटिंग तुम्हाला कळल्यावर कॉलिंग सुरु असताना पण सेटिंगमुळे तुमचे इंटरनेट सुरुच राहिल.

कॉलिंग वेळी असे चालेल इंटरनेट

  1. कॉलिंगच्यावेळी इंटरनेट सुरु राहावे यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधील सेटिंमगध्ये बदल करावा लागेल.
  2. सर्वात अगोदर तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंगमध्ये जा
  3. सिम आणि नेटवर्क सेटिंग हा पर्याय निवडा. आता सिम या पर्यायावर क्लिक करा
  4. आता ते सिम सलेक्ट करा ज्याची सेटिंग तुम्हाला बदलवायची आहे
  5. स्क्रोल केल्यावर access point names या पर्यायावर क्लिक करा
  6. इंटरनेट या पर्यायावर क्लिक करा. स्क्रोल केल्यावर bearer या पर्यायावर क्लिक करा
  7. त्यानंतर LTE या पर्यायावर क्लिक करा. एलटीई या पर्यायावर क्लिक केल्यावर ओके दाबा

काय होईल फायदा

  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला कॉलिंगवेळी सुद्धा इंटरनेटचा वापर करता येईल. तुम्ही कॉल सुरु असताना व्हॉट्सअपचा वापर करु शकता. गुगल ब्राऊझरवर सर्च करु शकता. आणि युपीआय पेमेंटवरुन सहज व्यवहार करु शकता. यानंतर तुम्हाला इंटरनेट सुरु ठेवण्यासाठी कॉलची सेंटिंग बदलावी लागणार नाही.
  • जर तुमचा मोबाईल सारखा हँग होत असेल तर लागलीच फोन बदलण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसल्या काही सेटिंगद्वारे, त्यातील बदलाद्वरे ही समस्या सोडवू शकता. काही सेटिंग बंद केल्या तर ही समस्या बऱ्यापैकी सुटू शकते.

फोन वारंवार होतो हँग?

तुमचा फोन वारंवार हँग होत असले तर काही गोष्टी लक्षात ठेवा. त्यासाठी सर्वात आधी तुमच्या फोनचे स्टोरेज क्लिअर करा. गरज नसलेल्या फाईल रिमुव्ह करा. गरजेच्या असतील तर त्या पेन ड्राईव्हमध्ये जतन करा. गरज नसलेल्या फाईल डिलिट करा. तुमच्या मोबाईलमधील Apps Update करा. त्यांचे लेटेस्ट व्हर्झन डाऊनलोड करा. बॅकग्राऊंडला गरज नसताना सुरु असलेले Apps बंद करा. फोन पुन्हा सुरु करा.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.