AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Scott Morrison : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींसाठी बनवली खास ‘गुजराती खिचडी’, कारणही आहे तितकंच खास…

Australia Prime Minister Scott Morrison : ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी नरेंद्र मोदींसाठी विशेष गुजराती खिचडी बनवली. त्यामागे एक विशेष कारण आहे.

Scott Morrison : ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी नरेंद्र मोदींसाठी बनवली खास 'गुजराती खिचडी', कारणही आहे तितकंच खास...
स्कॉट मॉरिसन यांनी मोदींसाठी बनवली खिचडीImage Credit source: स्कॉट मॉरिसन इन्स्टाग्राम
| Updated on: Apr 11, 2022 | 11:20 AM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) इतर देशांसोबत भारताचे संबंध अधिक वृद्धिगंत करण्यासाठी त्या देशांना भेटी देत असतात. ते काही व्यापारी करारही करताना पाहायला मिळतात. नुकतंच भारत (India) आणि ऑस्ट्रेलियात (Australia) एक व्यापारी करार झाला. त्याचा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Australia Prime Minister Scott Morrison) यांना विशेष आनंद झाला, तो आनंद त्यांनी भारतीय खिचडी खात साजरा केला. त्यामागे एक विशेष कारण आहे. पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत. खिचडी (Khichadi) हा तिथला प्रसिद्ध खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे स्कॉट मॉरिसन यांनी खिचडी बनवतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. ज्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

स्कॉट मॉरिसन यांचे ‘खिचडी’चे प्रयोग

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी खिचडी बनवली. त्यामागे कारणही तसंच आहे. नुकतंच भारत आणि ऑस्ट्रेलियात एक व्यापारी करार झाला. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी मॉरिसन यांनी खिचडी बनवली. त्याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या फोटोला त्यांनी “भारतासोबत आमचा नवीन व्यापार करार झाला. त्याचा आनंद साजरा करण्यासाठी मी खिचडी बनवली. माझे प्रिय मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये ही खिचडी आवडीने खाल्ली जाते. मोदी यांनाही खिचडी आवडते. त्यामुळे मी हा पदार्थ बनवला आहे”, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. दरम्यान, मॉरिसन यांनी याआधीही केरळची एक प्रसिद्ध डिश बनवली होती. त्याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता.

भारत ऑस्ट्रेलियात कोणता करार?

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नुकतंच ‘मुक्त व्यापार करार’ झाला आहे. ज्या अंतर्गत भारतातील 6 हजारांहून अधिक वस्तू ऑस्ट्रेलियाला शुल्कमुक्त निर्यात केल्या जाऊ शकतात. ऑस्ट्रेलिया आणि भारताचे संबंध जपण्यासाठी आणि अधिक मैत्रीपूर्ण होण्यासाठी हा करार महत्वपूर्ण आहे. भारतासोबतच्या मुक्त व्यापार कराराबद्दल स्कॉट मॉरिसन खूप आनंदी आहेत. मॉरिसन यांनी या कराराचा आनंद साजरा करत खिचडी बनवली आहे.

दरम्यान, चीनसोबत दोन हात करायचे असतील तर ऑस्ट्रेलियाला भारताच्या भूमीची गरज भासणार आहे. त्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियात मैत्रीपूर्ण संबंध असणं गरजेचं आहे.

संबंधित बातम्या

CCTV Video: ना चावीची गरज, ना हातोड्याचा घाव! ओढणीनं शटर फोडून पाचही चोरट्यांची एकसाथ धाव

गरीब मुस्लिम बांधवासोबत जे झालं, ते पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! धारवाडमधील संतापजनक घटना

मेट्रो स्टेशनवरच महिलेला प्रसूती वेदना, CISF महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने डिलेव्हरी

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.