AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन्ही लाल किल्ले बांधण्यापूर्वी मुघल कुठे राहत होते? जाणून घ्या त्यांचा इतिहास!

मुघलांनी भारतात अनेक वर्षे राज्य केले आणि भव्य किल्ले बांधले. दिल्ली आणि आग्राच्या लाल किल्ल्यांसारख्या इमारती त्यांचे वैभव दाखवतात. पण हे किल्ले बांधण्यापूर्वी मुघल कुठे राहायचे आणि त्यांचे आयुष्य कसे होते, हे जाणून घेऊया.

दोन्ही लाल किल्ले बांधण्यापूर्वी मुघल कुठे राहत होते? जाणून घ्या त्यांचा इतिहास!
Red FortImage Credit source: Tv9 Network
साक्षी कणसे
साक्षी कणसे | Edited By: | Updated on: Aug 09, 2025 | 3:06 PM
Share

भारतात मुघलांनी सुमारे 300 वर्षे राज्य केले. त्यांच्या काळात अनेक भव्य किल्ले आणि इमारती बांधल्या गेल्या, ज्या आजही देशाचा गौरव वाढवत आहेत. यातील दिल्लीचा लाल किल्ला आणि आग्राचा लाल किल्ला हे सर्वात प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, हे दोन्ही किल्ले बांधण्याआधी मुघल शासक कुठे राहत होते आणि त्यांचा दिनक्रम कसा होता? चला, याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.

आग्राचा लाल किल्ला आणि मुघलांचे निवासस्थान

अकबर आणि फतेहपूर सिक्री: आग्रा हे मुघलांच्या प्रमुख शहरांपैकी एक होते आणि 1638 पर्यंत ते त्यांचे मुख्य ठिकाण होते. आग्राचा लाल किल्ला १६ व्या शतकात सम्राट अकबराने बांधला होता. पण हा किल्ला बांधण्याआधी अकबराने फतेहपूर सिक्री येथे 14 वर्षे आपली राजधानी ठेवली होती. नंतर पाण्याचा तुटवडा जाणवू लागल्यामुळे त्याने राजधानी लाहोरला हलवली आणि नंतर तो पुन्हा आग्राला परतला.

आग्रा किल्ला: आग्राचा लाल किल्ला पूर्ण झाल्यावर तो मुघल सम्राटांचे मुख्य निवासस्थान बनला.

दिल्लीचा लाल किल्ला भारताच्या गौरवाचे प्रतीक आहे. त्याचे बांधकाम 17 व्या शतकात मुघल बादशाह शाहजहानने सुरू केले. लाल दगडांनी बनलेला असल्यामुळे त्याला ‘लाल किल्ला’ म्हणतात, पण त्याचे मूळ नाव ‘किल्ला-ए-मुबारक’ होते.

आग्रावरून दिल्लीला राजधानी: लाल किल्ल्याचे बांधकाम 1638 मध्ये सुरू झाले आणि ते पूर्ण व्हायला सुमारे १० वर्षे लागली. या काळात शाहजहान आग्रावरूनच राज्य चालवत होता. मुघल साम्राज्याच्या पहिल्या चार पिढ्यांनी आग्रा किल्ल्यावरूनच संपूर्ण देशावर राज्य केले होते.

दिल्लीला स्थलांतर: लाल किल्ला तयार झाल्यावर शाहजहानने मुघलांची राजधानी आग्रावरून दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला आणि दिल्लीचा लाल किल्ला हे मुघलांचे मुख्य निवासस्थान बनले.

किल्ले हे फक्त निवासस्थान नव्हते

मुघल बादशाह त्यांच्या ऐश्वर्य आणि वैभवासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी बांधलेले किल्ले केवळ राहण्याची जागा नव्हती, तर ती प्रशासकीय, सांस्कृतिक आणि लष्करी केंद्रेही होती. या किल्ल्यांमध्ये शाही कुटुंबासाठी महाल, सुंदर बागा, संगीत कक्ष आणि मौल्यवान रत्नांनी सजवलेल्या खोल्या होत्या. त्यांचे जीवनशैली, जेवण, कपडे आणि उत्सव यांमध्येही त्यांची भव्यता दिसून यायची.

थोडक्यात, दिल्ली आणि आग्राचे लाल किल्ले बांधण्यापूर्वी मुघल शासक हे वेगवेगळ्या शहरांमधील किल्ले आणि राजवाड्यांमध्ये राहत होते, पण आग्राचा लाल किल्ला हे त्यांचे प्रमुख केंद्र होते.

Follow Us
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? बड्या नेत्याचं भाकित ऐकून चकित व्हाल
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवास..
पुन्हा केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं? मोर्चा थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे... नेमकं प्रकरण काय?
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे...
एरवी सर्व विषयांवर बोलणारे शहा प्रधानांच्या विषयावर गप्प, म्हणजे... फडणवीसांचा उल्लेख करत बड्या नेत्याचा धक्कादायक दावा
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच...
धनंजय मुंडेंचा कमबॅक? आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच... मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा
माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपके
Exclusive | माझा फोन हिसकावला, खूप मारलं नंतर... अभिजीत दीपकेने सांगितलं जंतर-मंतरवर पहिल्या दिवशी काय घडलं?
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; देवस्थानात...
वाईतील महागणपती मंदिराला पाण्याचा वेढा; पाणी देवस्थानात शिरल्यानंतरही भक्तिभावाने महाआरती
भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात, नवी माहिती...
Ashok Kharat | भोंदू खरात अडचणीत येण्याची शक्यता, बनावट खाते प्रकरणात...नेमकी नवी माहिती काय?
धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले, तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने...
Rain Update | धरणाचे 30 दरवाजे पूर्ण उघडले तरी... तब्बल 1 लाख 70 हजार क्युसेकने विसर्ग सुरु
मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन...; साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
Ameet Satam on Raj Thackeray | मिमिक्री आर्टिस्ट, स्टँडअप कॉमेडियन म्हणत...; अमित साटम यांनी राज ठाकरेंना डिवचलं
NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार
Raj Thackeray | NEET आंदोलनातील व्हायरल रिया अहिरचा राज ठाकरेंच्या हस्ते सत्कार