AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral : अन्नाची किती ही नासाडी? IAS अधिकाऱ्यानं शेअर केला लग्नसमारंभातला खाद्यपदार्थांचा Photo

Food wasted in wedding : लग्नादरम्यान अन्नाची सर्वाधिक नासाडी होते. सध्या एक फोटो (Photo) व्हायरल (Viral) होत आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स (Global Hunger Index) 2021मध्ये भारत 116 देशांच्या यादीत 101व्या क्रमांकावर असताना ही परिस्थिती आहे.

Viral : अन्नाची किती ही नासाडी? IAS अधिकाऱ्यानं शेअर केला लग्नसमारंभातला खाद्यपदार्थांचा Photo
विवाहादरम्यान वाया गेलेलं अन्न
| Updated on: Feb 20, 2022 | 11:06 AM
Share

Food wasted in wedding : भारतात लग्नात पाण्यासारखा पैसा वाया जातो! सजावटीपासून ते खाद्यपदार्थ आणि वधू-वरांचे कपडे सर्वच खास असते. यामुळेच आपल्या देशात लग्नादरम्यान लाखो रुपये फक्त खाण्यावरच खर्च होतात. अशा परिस्थितीत सर्वाधिक अन्नाची नासाडी केवळ विवाहांमध्येच दिसून येते. अनेकवेळा लग्नसमारंभात असे दिसून येते, की लोक भरलेले संपूर्ण ताटही कचराकुंडीत टाकतात. ग्लोबल हंगर इंडेक्स (Global Hunger Index) 2021मध्ये भारत 116 देशांच्या यादीत 101व्या क्रमांकावर असताना ही परिस्थिती आहे. अशा स्थितीत लग्न आणि पार्ट्यांमध्ये अन्नाची नासाडी करणे हे उपरोधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून एक फोटो (Photo) व्हायरल (Viral) होत आहे. जो खरोखरच चिंताजनक आहे. अन्नाचा कधीही अपमान होता कामा नये आणि अन्नाची नासाडी करू नये, हे लहानपणी आपण सगळेच ऐकत मोठे होतो, पण लग्नात किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात आपण लहानपणाचा हा धडा विसरतो.

फोटो व्हायरल

याचसंदर्भात आता एक फोटो व्हायरल होत आहे. हा पुरावा म्हणजे हा व्हायरल फोटो, ज्यामध्ये एक व्यक्ती उरलेल्यया अन्नाच्या प्लेट्स तसेच लग्नात टाकलेले वाया गेलेले अन्न साफ ​​करताना दिसत आहे. तसे पाहिले तर हे अन्न अनेक भुकेल्यांचे पोट सहज भरू शकते.

ट्विटरवर शेअर

व्हायरल होत असलेला हा फोटो आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिले, ‘तुम्ही तुमच्या लग्नाच्या फोटोग्राफरकडून मिस केलेला फोटो. अन्न वाया घालवणे बंद करा.” हे चित्र पाहिल्यानंतर लोक प्रचंड संतापलेले दिसत आहेत आणि कमेंट्समधून त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

‘गरजूंना दिले पाहिजे’

एका यूझरने लिहिले, की असे नियम केले पाहिजेत जेणेकरून अन्नाची अशी नासाडी टाळता येईल. आणखी एकाने लिहिले, ‘लग्नात उरलेलं अन्न गरजूंना वाटले पाहिजे.’ याशिवाय इतरही अनेक यूझर्सनी यावर कमेंट करून आपली प्रतिक्रिया दिली.

आणखी वाचा :

Video viral : ‘याच्या’ हौसेला मोलच नाही! 1-1 रुपया जमवत अखेर खरेदी केली आपल्या स्वप्नातली स्कूटर

‘कोरोनानं लावलं जगाला वेड, त्याची सर्वांना लागण.. या सुरक्षेनं लावला वेळ, झालंबाबा एकदाचं लगन’, यासह ऐका भन्नाट Ukhane

Viral Video : …म्हणून कधी चुकीचं काम करू नये, रस्त्यावरून भरकटलेल्यांना ‘या’ काकांनी दाखवला योग्य रस्ता

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.