53 लग्न केली! नेहमी “अशा” बायकोच्या शोधात असायचा

अबू यांनी सांगितलं की, त्याने वयाच्या 20 व्या वर्षी पहिल्यांदा त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या महिलेशी लग्न केले.या ५३ विवाहांमध्ये सगळ्यात कमी काळ टाकलेलं लग्न हे फक्त एका रात्री पुरतं होतं.

53 लग्न केली! नेहमी अशा बायकोच्या शोधात असायचा
लग्नासाठीच्या अटींचा मॅसेज व्हायरलImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 11:26 AM

भारतात लग्नाला फार महत्त्व आहे. हिंदू धर्मानुसार लग्न म्हणजे सात जन्मांचं अतूट नातं असतं. अगदी ते सात जन्म टिकावं म्हणावं लोकं तर उपवास सुद्धा करतात. पण जगात बऱ्याच ठिकाणी अनेक विवाह केले जातात. भारतात सुद्धा आपण असे अनेक किस्से ऐकलेत ज्यात एक व्यक्ती 3-4 वेळा लग्न करतो. पण एक किस्सा सध्या खूप व्हायरल होतोय तो म्हणजे सौदीच्या एका व्यक्तीने चक्क 53 लग्न केलेत. आयुष्यात मानसिक शांती आणि स्थैर्य मिळवण्यासाठी या व्यक्तीने गेल्या 43 वर्षात 53 व्यांदा लग्न केलंय. आहे की नाही आश्चर्यकारक? इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, 63 वर्षीय अबू अब्दुल्ला यांनी आपण इतकी लग्न वैयक्तिक सुखासाठी नव्हे तर शांततेसाठी केली असल्याचं म्हटलंय.

अबू यांनी सांगितलं की, त्याने वयाच्या 20 व्या वर्षी पहिल्यांदा त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठ्या असलेल्या महिलेशी लग्न केले.या ५३ विवाहांमध्ये सगळ्यात कमी काळ टाकलेलं लग्न हे फक्त एका रात्री पुरतं होतं.

अबू आपली पहिली पत्नी आणि मुलांसह आरामदायी जीवन जगत होता. पण तीन वर्षांनंतर अचानक असं काहीतरी झालं ज्यामुळे त्याने लगेच दुसरं लग्न ठरवलं. त्यानंतर वयाच्या 23 व्या वर्षी त्यांनी पुन्हा लग्न केलं.

अब्दुल्लाने गेल्या 43 वर्षांत त्याने 53 विवाह केले आहेत. परदेश दौऱ्यांच्या दरम्यान बायकोची कमी जाणवायची. त्यामुळे तो जिथे जिथे गेला त्याने लग्न केलं.

अब्दुल्ला म्हणतो की, “मी सर्वांना समान वागणूक दिली आहे आणि त्यांना समान अधिकार दिले आहेत.” केवळ शांतता आणि आरामासाठी आपण इतकी लग्न केली, असे अब्दुल्ला म्हणतात.

तो नेहमी अशा बायकोच्या शोधात असायचा, जी त्याला पूर्णपणे समजू शकेल, सांत्वन देईल आणि त्याला नेहमी आनंदी ठेवेल. या 53 लग्नांमध्ये त्यांनी बहुतांश सौदी महिलांना आपली वधू बनवले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.