AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | इतकी स्वच्छ पाणीपुरी जगात भारी, परंतू युजरनी दिली अशी प्रतिक्रीया की तुमचा मूड खराब होईल

पाणीपुरी खाताना आवडीने खाल्ली जात असते. अशावेळी पाणीपुरी खाताना स्वच्छता पाळली जात आहे का ? याची आपण काळजी तितकी घेत नाही. मात्र पाणीपुरी तयार करण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरुन अनेक मजेशीर प्रतिक्रीया येत आहेत.

Viral Video | इतकी स्वच्छ पाणीपुरी जगात भारी, परंतू युजरनी दिली अशी प्रतिक्रीया की तुमचा मूड खराब होईल
pani puriImage Credit source: socialmedia
| Updated on: Sep 15, 2023 | 3:19 PM
Share

सुरत | 15 सप्टेंबर 2023 : पाणीपुरीचे नाव जरी काढले तरी खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पाणीपुरी किंवा गोलगप्पे नावाने ओळखले जाणारे हे स्ट्रीटफूड प्रचंड प्रसिद्ध आहे. चटपटीत पाणीपुरी खाण्यासाठी खवय्ये ती विकणाऱ्या भय्यांवर विश्वास ठेवून तिला संपवितात. तरीही विक्रेत्यांनी पाणीपुरी बनविताना हातात हॅण्डग्लोज घातले आहेत. पाणीपुरीसाठी स्वच्छ पाणी वापरले आहे का ? या चिंता पट्टीच्या खवय्यांना पडत असतात. परंतू पाणीपुरीचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो पाहून हीच जगातील सर्वात स्वच्छ पाणीपुरी अशी प्रतिक्रीया युजर व्यक्त करीत आहेत.

एका फूड व्लॉगरने पाणीपुरी निर्मितीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. गुजरातच्या सुरत येथील कारखान्यातील हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. एका स्वयंचलित मशिनीत पीठ मळून त्याच्या गोल पुऱ्या कापल्या जातात. त्यानंतर या पुऱ्या मोठ्या फ्रायरमध्ये तळल्या जाऊन त्यांना चाळणीत तेल गाळून कोरडे केले जाते. त्यानंतर या पाणीपुरी पॅकेटमध्ये पॅक केल्या जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत मानवी स्पर्श कुठेही दिसत नाही. त्यामुळे या व्हिडीओला शेअर करणाऱ्याने सर्वात स्वच्छ पाणीपुरी अशी सुंदर कॅप्शन दिली आहे.

most hygienic panipuri video watch here –

पाणीपुरीच्या या व्हायरल क्लिपला इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहे. या पाणीपुरीच्या व्हिडीओत संपूर्ण प्रक्रियेत मानवी हस्तक्षेपाशिवाय तयार झालेल्या व्हिडीओतील स्वच्छतेची प्रशंसा केली जात आहे. अनेक युजरनी ही संपूर्ण देशातील एकमात्र स्वच्छ पाणीपुरी आहे म्हटले आहे. एका युजरने दावा केला आहे की, भारताची एकमेव खाण्यायोग्य पाणीपुरी. तर एका युजरने तिला, सर्वात स्वच्छ पाणीपुरी म्हटले आहे. तर अनेक युजरने हीची चव कदाचित भारतीय लोकांना आवडणार नाही. कारण त्यांना त्यांची नेहमीची अस्वच्छ पाणी खाण्याची सवय लागली आहे. तर एका युजरने म्हटले की, ‘असली स्वाद तर घाम आणि अस्वच्छतेमुळे येतो’. तर एका युजरने म्हटले की, ‘भारतीयांना ही पाणीपुरी आवडणार नाही.’

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.