AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोनवर बोलता बोलता जावयावर जडला जीव, कविता गेली राहुलसोबत पळून; अनोख्या ‘लव्हस्टोरीची’ चर्चा!

सध्या एक अजब-गजब प्रकरण समोर आले आहे. कविता नावाची महिला आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेली आहे.

फोनवर बोलता बोलता जावयावर जडला जीव, कविता गेली राहुलसोबत पळून; अनोख्या 'लव्हस्टोरीची' चर्चा!
aligarh woman fled with daughter fiancee
| Edited By: | Updated on: Apr 10, 2025 | 8:28 PM
Share

सध्या एका अजब प्रेमाचं गजब प्रकरण समोर आलं आहे. अलिगडमध्ये एक महिला आपल्या होणाऱ्या जावयासोबतच पळून गेली आहे. विशेष म्हणजे ही महिला घरातील दागिने आणि पैसे घेऊन घरातून पसार झाली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जनपद अलिगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पळून गेलेल्या महिलेचे नाव कविता आहे. ही महिला ज्या तरुणासोबत पळून गेली आहे, त्याचे नाव राहुल असे आहे. राहुल हा तिचा होणारा जावई होता. पळून गेलेल्या कविताच्या मुलीचे लग्न राहुलसोबत 16 एप्रिल रोजी होणार होते. त्याआधीच ही महिला घरातील अडीच लाख रुपये आणि दागिने घेऊन पळून गेली आहे.

नवरीने नेमकं काय सांगितलं?

कविताच्या मुलीचे नाव शिवानी असे आहे. शिवानीचे राहुलशी लग्न होणार होते. तिनेच नेमका काय प्रकार घडला, हे सविस्तरपणे सांगितलंय. “येत्या 16 एप्रिल रोजी माझे लग्न होणार होते. माझ्यासाठी दादो या भागातून वरात येणार होती. माझ्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच राहुलने माझ्या आईला फोन गिफ्ट म्हणून दिला होता. मधल्या काळात या दोघांच्या एकमेकांशी खूप गप्पा व्हायच्या. आता माझी आई माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळून गेली आहे. ते दोघे पळून गेले याबाबत मला काहीही वाटत नाहीये. पण घरातील पैसे आणि दागिने घेऊन ते पळून गेले आहेत. 6 एप्रिल रोजी माझी आई घरातून पळून गेली आहे,” अशी माहिती या मुलीने दिले आहे.

कविताच्या नवऱ्याचं नेमकं म्हणणं काय?

“माझ्या बायकोने मला तिच्या बहिणीला लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी पाठवले होते. मात्र मी घरी येऊन पाहतो तर माझी बायको घरी नव्हती. मी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद होता. त्यानंतर मी राहुलला फोन केला. पण त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर रात्री 10 वाजता मला त्याचा कॉल आला. तुझ्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत. तू कवितासोबत 20 वर्षे राहिला आहेस. आता तू तिला विसरून जा, असं तो मला म्हणाला. मी पोलिसात तक्रार केली आहे,” अशी माहिती पीडित पतीने दिली आहे.

दोघांच्या रिल्स आल्या समोर

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला आहे. पोलिसांच्या या तपासात कविता आणि राहुल यांचे काही फोटो आणि रिल्स समोर आले आहेत. त्यावरून हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते, असा अंदाज लावला जात आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.