AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फोनवर बोलता बोलता जावयावर जडला जीव, कविता गेली राहुलसोबत पळून; अनोख्या ‘लव्हस्टोरीची’ चर्चा!

सध्या एक अजब-गजब प्रकरण समोर आले आहे. कविता नावाची महिला आपल्या होणाऱ्या जावयासोबत पळून गेली आहे.

फोनवर बोलता बोलता जावयावर जडला जीव, कविता गेली राहुलसोबत पळून; अनोख्या 'लव्हस्टोरीची' चर्चा!
aligarh woman fled with daughter fiancee
| Edited By: | Updated on: Apr 10, 2025 | 8:28 PM
Share

सध्या एका अजब प्रेमाचं गजब प्रकरण समोर आलं आहे. अलिगडमध्ये एक महिला आपल्या होणाऱ्या जावयासोबतच पळून गेली आहे. विशेष म्हणजे ही महिला घरातील दागिने आणि पैसे घेऊन घरातून पसार झाली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना जनपद अलिगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पळून गेलेल्या महिलेचे नाव कविता आहे. ही महिला ज्या तरुणासोबत पळून गेली आहे, त्याचे नाव राहुल असे आहे. राहुल हा तिचा होणारा जावई होता. पळून गेलेल्या कविताच्या मुलीचे लग्न राहुलसोबत 16 एप्रिल रोजी होणार होते. त्याआधीच ही महिला घरातील अडीच लाख रुपये आणि दागिने घेऊन पळून गेली आहे.

नवरीने नेमकं काय सांगितलं?

कविताच्या मुलीचे नाव शिवानी असे आहे. शिवानीचे राहुलशी लग्न होणार होते. तिनेच नेमका काय प्रकार घडला, हे सविस्तरपणे सांगितलंय. “येत्या 16 एप्रिल रोजी माझे लग्न होणार होते. माझ्यासाठी दादो या भागातून वरात येणार होती. माझ्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजेच राहुलने माझ्या आईला फोन गिफ्ट म्हणून दिला होता. मधल्या काळात या दोघांच्या एकमेकांशी खूप गप्पा व्हायच्या. आता माझी आई माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत पळून गेली आहे. ते दोघे पळून गेले याबाबत मला काहीही वाटत नाहीये. पण घरातील पैसे आणि दागिने घेऊन ते पळून गेले आहेत. 6 एप्रिल रोजी माझी आई घरातून पळून गेली आहे,” अशी माहिती या मुलीने दिले आहे.

कविताच्या नवऱ्याचं नेमकं म्हणणं काय?

“माझ्या बायकोने मला तिच्या बहिणीला लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी पाठवले होते. मात्र मी घरी येऊन पाहतो तर माझी बायको घरी नव्हती. मी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिचा फोन बंद होता. त्यानंतर मी राहुलला फोन केला. पण त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यानंतर रात्री 10 वाजता मला त्याचा कॉल आला. तुझ्या लग्नाला 20 वर्षे झाली आहेत. तू कवितासोबत 20 वर्षे राहिला आहेस. आता तू तिला विसरून जा, असं तो मला म्हणाला. मी पोलिसात तक्रार केली आहे,” अशी माहिती पीडित पतीने दिली आहे.

दोघांच्या रिल्स आल्या समोर

दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास चालू केला आहे. पोलिसांच्या या तपासात कविता आणि राहुल यांचे काही फोटो आणि रिल्स समोर आले आहेत. त्यावरून हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते, असा अंदाज लावला जात आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.