Government Scheme : 5 लाखांपर्यंताचे उपचार मोफत, इतर ही अनेक सुविधा, केंद्र सरकारची कोणती आहे ही योजना..

Government Scheme : आता मोठ्या आजारावर 5 लाखांपर्यंताचे उपचार मोफत होऊ शकतात..केंद्र सरकारची ही योजना माहिती आहे का?

Government Scheme : 5 लाखांपर्यंताचे उपचार मोफत, इतर ही अनेक सुविधा, केंद्र सरकारची कोणती आहे ही योजना..
उपचार मिळवा मोफतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 8:12 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांना मोठ्या आजारांशी (Illness) लढण्यासाठी एक खास योजना आणली आहे. या योजनेतंर्गत (Health Scheme) 5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च सरकार उचलते. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्ये म्हणजे मोफत उपचाराशिवाय (Treatment) इतर सुविधाही लाभार्थ्यांना देण्यात येतात. ही खास योजना कोणती ते पाहुयात..

राष्ट्रीय आरोग्य संरक्षण ( National Health Protection) या मिशनतंर्गत ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थ्याला 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचाराचा खर्च सरकार करेल. तसेच इतर सुविधाही मिळतील.

आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat Scheme) असे या योजनेचे नाव आहे. या योजनेतंर्गत गरीब कुटुंबांना दरवर्षी 5 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात येते. योजनेतंर्गत देशातील लाखो गरीब कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

देशात मोठ्या प्रमाणात नागरीक या योजनेत सहभागी होत आ हे. लाखो अर्ज या योजनेसाठी केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाला प्राप्त होत आहेत. या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने 2018 साली केली होती. उपचाराअभावी होणाऱ्या मृत्यूचा आकडा कमी करणे हा योजनेचा उद्देश आहे.

प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेतंर्गत लाभार्थ्यांना शस्त्रक्रिया, उपचार, औषधींचा खर्च तसेच 1350 मेडिकल पॅकेजची सुविधा देण्यात येते. या माध्यमातून उपचारापोटी करण्याता येणारा खर्च रुग्णालयांना हस्तांतरीत करण्यात येतो.

या योजनेची तांत्रिक बाजू मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे लवकरच लाभार्थ्यांना विना कागदपत्र, विना रोख रक्कम या सुविधेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची आरोग्य हिस्ट्री आणि वैयक्तिक तपशील जतन करण्यात येणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सार्वजनिक आरोग्य केंद्रावर चौकशी करावी लागेल. तिथे अर्ज भरुन आवश्यक ती कागदपत्रे जमा करुन या योजनेचा तुम्हाला लाभ घेता येईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला आधार कार्ड, राशन कार्ड, मोबाईल क्रमांक, रहिवाशी प्रमाणपत्र द्यावे लागेल. या कागदपत्राशिवाय अर्जाची नोंदणी होणार नाही. त्यामुळे आवश्यक ती कागदपत्रे घेऊनच अर्ज भरावा लागेल.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.