AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डेबिट कार्ड सुरक्षीत कसे ठेवाल?; ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

डेबिट कार्डने आर्थिक व्यवहारात क्रांती आणली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. डेबिट कार्डमुळे आर्थिक देवाण, घेवाण सोपी झाली, तसेच जवळ पैसे बाळगण्याची देखील आवश्यकता राहिली नाही. मात्र डेबिट कार्डच्या माध्यमातूनच अनेकांची फसवणूक झाल्याच्या देखील घटना घडल्या आहेत.

डेबिट कार्ड सुरक्षीत कसे ठेवाल?; ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी जाणून घ्या 'हे' सोपे उपाय
ATM/ Debit Card
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 6:15 AM
Share

नवी दिल्ली : डेबिट कार्डने आर्थिक व्यवहारात क्रांती आणली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. डेबिट कार्डमुळे आर्थिक देवाण, घेवाण सोपी झाली, तसेच जवळ पैसे बाळगण्याची देखील आवश्यकता राहिली नाही. डेबिट कार्डमुळे कुठल्याही जवळच्या एटीएममधून आपल्याला क्षणात पैसे मिळू शकतात. मात्र डेबिट कार्डचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. डेबिटच्या माध्यमातून आतापर्यंत अनेकांना गंडा घातला गेल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकांची मोठी आर्थिक फसवणूक झाली आहे. फसवणूक टाळून डेबिटच्या माध्यमातून कसा अधिकाधिक सुरक्षीत व्यवहार करता येईल हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

एटीएममधून पैसे काढताना काय काळजी घ्याल?

जेव्हा तुम्ही पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाता, तेव्हा ते मशिन आधी व्यवस्थित तपासून घ्या, एटीएम पीन टाकताना तुमच्या जवळपास कोणी नाहीना? याची खात्री करा. तसेच पीन टाकताना एटीएम मशीन व्यवस्थित कव्हर करा. जर तुम्ही पहिल्यांदाच डेबिट कार्डचा वापर करत असाल आणि तुम्हाला ते वापरण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्यास इतरांची मदत घेऊ नका. कारण त्यातून अनेकवेळा तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. तुम्ही जेव्हा एटीएममधून पैसे काढता, तेव्हा प्रत्येकवेळी तुम्हाला पैसे कपातीचा एक एसएमएस किंवा मेल येतो, तो चेक करून आपण जेवढे पैसे काढले आहेत, तेवढेच खात्यामधून कमी झाले आहेत का? याची खात्री करून घ्या. तुम्ही डेबिट कार्डच्या मदतीने कुठलाही व्यवहार केला नाही, मात्र तरी देखील तुमचे पैसे कमी झाल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा.

स्टेटमेंटवर लक्ष ठेवा

बऱ्याचवेळ डिजिटल फसवणूक ही छोट्या-छोट्या अमाऊंटमधून होत असते. त्यामुळे जर तुम्हाला तुमचे पैसे अशापद्धतीने खात्यामधून कपात झालेले आढळल्यास किंवा तुम्ही अकाऊंट चेक करताना पैसे कमी आढळल्यास तातडीने बँकेशी संपर्क साधा. एटीएममधून पैस काढल्यानंतर शिल्लक राहिलेल्या पैशांचा येणारा एसएमएस तपासून घ्या.

…तर तुम्हाला बँकेतून  मिळेल पूर्ण रिफंड

जर समाजा तुमच्या खात्यामधून पैस कट झाले किंवा तुमची कोणी ऑनलाईन फसवणूक केली तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा. तुमचे डेबिट कार्ड ब्लॉक करा. अशा परिस्थिमध्ये तुम्ही थेट सायबर सेलकडे देखील तक्रार करू शकता. तुमच्या खात्यामधून किती रक्कम कपात झाली याची माहिती तुमच्या बँकेला द्या. आरबीआयच्या नियमानुसार जर तुमची कोणतीही चूक नाही आणि तरी देखील तुमच्या खात्यामधून पैशांची कपात झाली तर बँकेला तुमच्या खात्यामधून जेवढी रक्कम कपात झाली आहे, ती पूर्ण देणे बंधनकारक असते.

संबंधित बातम्या

अर्थ नियोजन वाचवेल तुमचा गृहकर्जाचा ताण, या 4 गोष्टींची काळजी घेतल्यास कर्जाच्या घरातही सुखाची झोप

लग्नानंतर पीएफ खात्यात वारसाचे नाव कसे करावे अपडेट; जाणून घ्या पूर्ण प्रक्रिया आणि नियम

अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला अच्छे दिन, 2022 पर्यंत 15 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची शक्याता, रोजगार वाढणार

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.