AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway | अरे देवा, तिकीट हरवलं? मग प्रवास करता येतो का राजे हो..

Indian Railway | आता धावपळत येऊन, रांगेत उभं राहून तुम्ही तिकीट काढलं. रेल्वेची वाट पाहत घाम पुसला. थोड्यावेळानं तुमच्या लक्षात आलं, बाबो, तिकीट तर हरवलं. मग अशावेळी प्रवास करता येणार का? ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्री असताना तिकीटासंबंधीचा नियम बदलला, तुम्हाला फायदा होईल की तोटा?

Indian Railway | अरे देवा, तिकीट हरवलं? मग प्रवास करता येतो का राजे हो..
रेल्वे तिकीट हरवल्यास काय करावेImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Aug 29, 2022 | 7:07 AM
Share

Indian Railway | आता धावपळत येऊन, रांगेत उभं राहून तुम्ही तिकीट (Railway Ticket) काढलं. रेल्वेची वाट पाहत घाम पुसला. थोड्यावेळानं तुमच्या लक्षात आलं, बाबो, तिकीट तर हरवलं. मग अशावेळी प्रवास (Long Journey) करता येणार का? बऱ्याचदा आपण घाई गडबडीत तिकीट कुठे तरी ठेऊन देतो. वेंधळेपणाचा त्यावेळी आपल्याला राग आलेला असतो. पण करणार काय, कारण प्लॅटफॉर्मवर (Railway Platform) रेल्वेगाडी धडधड करत येते आणि आपण विचारात गुंग असतो की आता प्रवास कसा करणार? तिकीट तपासणीसाने (Ticket Collector) पकडलं तर कितीचा दंड बसेल. आपण तिकीट काढल्याचं, पण ते हरवल्यावर तो कितपत विश्वास ठेवेल. अनेक प्रश्न तुमच्या मनात पिंगा घालतील. तुमचा प्रवासाचा उत्साहावर पाणी फिरेल. पण खरंच तिकीट नसेल तर प्रवास करता येतो का? ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्री असताना तिकीटासंबंधीचा नियम बदलला, तुम्हाला फायदा होईल की तोटा?

बॅनर्जी यांचा निर्णय काय?

तिकीट खरेदी केल्यानंतर ते हरवलं, विसरलं तर मोठं संकट पडायचं. कारण नियमचं तसे होते. विना तिकीट प्रवास हा कायदेशीर गुन्हाच मानण्यात येत होता. त्यासाठी रितसर तिकीट रक्कम आणि दंडाची रक्कम टीटी वसूल करायचे. पण ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री झाल्या आणि त्यांनी हा नियम बदलून टाकला. प्रवासादरम्यान तिकीट जवळ बाळगण्याची गरज नसल्याचा नियम त्यांनी केला. जर तिकीट काढले असेल तर त्याची क्रमांक अथवा मोबाईलवर आलेला बुकिंग एसएमएस त्यांनी महत्वाचा मानला.

रेल्वे तिकीटासाठी एसएमएस वैध!

आता ऑनलाईन, मोबाईल, अॅपवर बुकिंगची सोय झाली आहे. त्याद्वारे मोबाईल क्रमांकावर सीट आणि बर्थ नंबरचा मेसेज आला असेल. तिकीटही कन्फर्म असेल. तर रेल्वे या एसएमएसला वैध मानते. पण त्यासाठी एक अट घालण्यात आली आहे. तुम्ही ऑनलाईन ‘आयआरसीटीसी’कडून (IRCTC) तिकीट बुक केले असेल तर तुम्हाला आलेला एसएमएस (Railway Ticket SMS) वैध मानण्यात येतो. पण काऊंटरवरुन तिकीट खरेदी करताना एसएमएसचा प्रश्नच येत नसल्याने तिकीट हरवल्यास तुम्हाला दुसरा पर्याय राहत नाही.

मग प्रवास करता येईल का नाही?

जर तुम्ही काऊंटर तिकीट घेतले असेल आणि तिकीट तुमच्याकडे नसेल तर प्रवाशाला काही अटींची पूर्तता करून प्रवास करण्याची मुभा दिली जाते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला टीटीला त्याने तिकीट घेतले पण हरवल्याचे सांगावे लागेल. तसेच तिकीटाचा दर आणि दंडही भरावा लागेल. तुम्ही कोणत्या डब्यातून प्रवास करत आहात, त्यावर तिकीटाचा दर निश्चित असतो. त्यामुळे त्याआधारे रक्कम अदा करत तुम्हाला प्रवास करता येईल.

रेल्वेचे होऊ शकते नुकसान

काऊंटरवरून खरेदी केलेले तिकीट प्रवाशाने संभाळून ठेवणे आवश्यक आहे. बऱ्याचदा तिकीट रद्द करुन प्रवाशी रक्कम परत घेतात आणि पुन्हा तिकीट असल्याच्या अविर्भावात रेल्वेने प्रवास करतात. त्यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होते. त्यामुळे काऊंटरवरचे तिकीट असल्यास तुम्हाला ते सांभाळून ठेवणे गरजेचे आहे.

ई-तिकीट वैध

ई-तिकीट (E Ticket) असेल तर तुम्ही फक्त टीटीईला मेसेज दाखवा अथवा तिकिटाचा स्क्रीनशॉट दाखवा. काही वर्षांपूर्वी रेल्वे ई-तिकिटांसाठीही प्रिंट आऊटची मागणी करत असे. जर प्रिंट नसेल तर हा प्रवासही अवैध मानण्यात येत होता. परंतु, हा जेव्हा  ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री झाल्या. त्यांनी हा नियम बदलला. 2012 मध्ये ई-तिकीटधारकांना तिकिटाची प्रिंट आऊट ठेवण्याचे बंधन रद्द केले.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.