AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax Refund : तुमचं तर नाव नाही ना यादीत? इतक्या लाख करदात्यांना रिफंड नाहीच

Income Tax Refund : देशातील जवळपास 7 कोटी करदात्यांना रिटर्न दाखल केला आहे. त्यातील 2.5 कोटींहून अधिक करदात्यांना रिफंड दिला. पण इतक्या लाख करदात्यांना त्यांची ही कारणं भोवली. त्यांना आयकर रिफंड मिळाला नाही. याविषयीची माहिती आयकर विभागाने दिली आहे.

Income Tax Refund : तुमचं तर नाव नाही ना यादीत? इतक्या लाख करदात्यांना रिफंड नाहीच
| Updated on: Sep 06, 2023 | 8:30 AM
Share

नवी दिल्ली | 6 सप्टेंबर 2023 : यंदा मोठ्या प्रमाणात आयकर रिटर्न दाखल करण्यात आले. मूल्यांकन वर्ष 2023-24 मध्ये 6.98 कोटी आयटीआर दाखल केला. आयकर विभागाने यामधील 2.5 कोटींहून अधिक करदात्यांना रिफंड दिला. पण अनेक करदाते अद्यापही रिफंड मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण केल्यावरही कोणत्या कारणाने आयटीआर रिफंड मिळाला नाही, असा सवाल करदात्यांना पडला आहे. आयटीआर रिफंड (ITR Refund) मिळण्यास विलंब का झाला यासंबंधीची कारणे आयकर विभागाने दिली आहे. मंगळवारी विभागाने (Income Tax Department) याविषयीची माहिती दिली. त्यानुसार इतक्या लाख करदात्यांना आयकर रिफंड देण्यात आला नाही. त्यामागील कारणमीमांसा पण करण्यात आली.

2.45 कोटी करदात्यांना रिफंड

यंदा मूल्यांकन वर्ष 2023-24 मध्ये 6.98 कोटी आयटीआर दाखल झाले. त्यातील 6.84 कोटी आयटीआर व्हेरिफाईड, आयटीआरचा पडताळा झाला आहे. 6 कोटींहून अधिक आयटीआरची प्रक्रिया झाली आहे. यातील 2.45 कोटी करदात्यांच्या खात्यात रिफंडची रक्कम देण्यात आली. पण यातील काही करदात्यांच्या खात्यात रिफंड जमा करण्यात येणार नाही, याविषयीची कारणं प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केली आहे.

प्रक्रिया वेळेतच पूर्ण

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटीने याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, आयटीआरची प्रक्रिया जलद करण्यात आली. यंदा प्रक्रिया वेळेच्या आतच पूर्ण करण्यात आली. सरासरी वेळेपेक्षा हे काम अतिजलद म्हणजे पूर्वीपेक्षा 10 दिवसांनी कमी करण्यात आले. यापूर्वी मूल्यांकन वर्ष 2019-20 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 82 दिवस लागले होते. तर गेल्या वर्षी 2022-23 मध्ये 16 दिवस लागले होते.

या करदात्यांना नाही रिफंड

  1. आयटीआर रिफंडसाठी आयटीआर फाईलिंगची ई-पडताळणी करावी लागते. आयटीआर दाखल केल्या नंतर आणि रिफंड प्राप्त करण्यामधील ही महत्वाची प्रक्रिया आहे. सर्व करदात्यांना त्यांचे आयटीआर दाखल केल्याच्या 30 दिवसांच्या आत ई-पडताळणी, ई-व्हेरिफिकेशन करावे लागते. ज्यांनी ही प्रक्रिया केली नाही. त्यांचा रिफंड आलेला नाही. मूल्यांकन वर्ष 2023-24 मध्ये 14 लाख आयटीआर असे आहेत, ज्यांनी आतापर्यंत ई-व्हेरिफिकेशन केलेले नाही.
  2. तर 12 लाख असे आयटीआर आहेत, ज्यांच्याकडे अधिकची माहिती मागितली पण त्यांनी ती निर्धारीत कालावधीत दिली नाही. त्यांचा पण रिफंड रखडला आहे. उत्पन्नाविषयीची, स्त्रोतविषयीची अथवा इतर माहिती वेळेत न दिल्याने रिफंड रखडला आहे.
  3. आयटीआर रिफंड करताना चुकीचा बँकिंग तपशील जोडल्याने काहींना रिफंड मिळण्यात अडचण आली आहे. करदात्यांच्या खात्यात रिफंड जमा होणार नाही. बँक खात्यावरील नाव आणि पॅन कार्डचा तपशील यांचा मेळ झाला पाहिजे. रिफंड त्याच बँक खात्यात जमा होईल, ज्याचा उल्लेख आयटीआरमध्ये करण्यात आला .

Follow Us
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं
सावधान...महाराष्ट्रात बोगस नवरीचा धुमाकूळ, आठ तरुणांशी लग्न करून ठकवलं.
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक.....
नसरापूर प्रकरणावर राज्यभर संताप; पोस्टमॉर्टेम अहवालातील धक्कादायक......
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर
SRPF परीक्षेत खासगी प्रकाशनामधील ८५ प्रश्न जसेच्या तसे, कसं आलं समोर.
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,
...म्हणून नसरापूर प्रकरणातील आरोपीनं मोबाईल वापरणं बंद केलं होतं,.
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार
मोठी बातमी! ममता बॅनर्जी यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार.
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
भोंदू खरातसाठी 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी.
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी
अमित शहा ठरवणार बंगालचा मुख्यमंत्री, पक्षाने दिली सर्वात मोठी जबाबदारी.
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?
8 ग्रॅम सोनं, महिलांना 2500 रुपये, थलापती निवडणुकीत विजयी कसा झाला?.
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह
तिला कॅफेमध्ये बोलवलं अन्...एका चुकीमुळे भांडाफोड; बीडमधील आक्षेपार्ह.
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?
फडणवीस सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; नसरापूर प्रकरणानंतर नो पॅरोल धोरण लागू?.