AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IT Jobs : भारतीय IT कंपन्यांमध्ये नोकरीची हमी, इतक्या लाख तरुणांना मिळणार जॉब..

IT Jobs : भारतीय IT कंपन्यांमध्ये इतक्या लाख तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे..

IT Jobs : भारतीय IT कंपन्यांमध्ये नोकरीची हमी, इतक्या लाख तरुणांना मिळणार जॉब..
आयटी क्षेत्रात नोकऱ्यांची हमीImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Nov 17, 2022 | 5:48 PM
Share

नवी दिल्ली : एकीकडे टेक कंपन्यांमध्ये (Tech Companies) कर्मचारी कपातीचा ट्रेंड सुरु असताना भारतात मात्र आशादायक चित्र आहे. भारतातील आयटी क्षेत्रात (IT Sector) नोकऱ्यांचा (Jobs) पाऊस पडणार आहे. या क्षेत्रात लाखो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. त्यामुळे आयटी क्षेत्रात आनंदाची लहर आली आहे.

इन्फोसिस कंपनीचे सह संस्थापक क्रिस गोपालकृष्णन (Kris Gopalakrishnan) यांनी बुधवारी याविषयीची माहिती दिली. त्यांच्या दाव्यानुसार, आयटी क्षेत्रात तब्बल 2 लाख तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे.

येत्या काही दिवसात 2 लाख तरुणांची भरती करण्यात येणार आहे. कोविड काळात डिजिटल तंत्रज्ञानाची एकच लाट आली आहे. त्याचा फायदा व्यापार, व्यवसायात आणि लोकांच्या रोजच्या वापरात दिसून आला.

डिजिटलयाझेशनच्या युगात नवीन नोकऱ्याही तयार झाल्या आहेत. डिजिटलयाझेशनमुळे कंपन्यांच्या व्यापारातील प्रचार आणि प्रसाराला वेग आला आहे. त्याचा फायदा कंपन्यांनी घेतला असून वाढत्या कामासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांची आयटी कंपन्यांना गरज आहे.

बेंगळुरु येथील टेक समिटीमध्ये बोलताना गोपालकृष्णन यांनी भारतीय आयटी क्षेत्राच्या गुणवत्तेविषयी, दर्जाविषयी माहिती दिली. त्याआधारेच जागतिक व्यापारात आणि व्यवसायात आयटी क्षेत्राला मागणी आल्याचे त्यांनी सांगितले.

दोन लाख तरुणांना येत्या काही दिवसात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. आयटी क्षेत्रात काही दिवसांपासून राजीनामा सत्र सुरु होते. त्यावरही त्यांनी भाष्य केले. नोकरी सोडने, मूनलाईटिंग आणि कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये बोलविणे, असे आवाहनं असल्याचे त्यांनी सांगितले.

आयटी क्षेत्रात नोकऱ्यांची लाट येणार असल्याने या क्षेत्रात बुमिंग वाढले आहे. गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रात नोकऱ्या सोडून जाणाऱ्यांचे प्रमाण वाढलं होते.  या घोषणेमुळे या क्षेत्राकडे पुन्हा तरुणांचा ओढा वाढण्याची शक्यता आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.