AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल नंबर पोर्ट करायचाय, कंपनी चालढकल करतेय, कुठे तक्रार कराल?

Mobile number | तुम्ही भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात 'ट्राय'कडे (TRAI) याची तक्रार नोंदवू शकता. तुमची तक्रार मिळाल्यानंतर 'ट्राय'कडून संबंधित कंपनीवर योग्य कारवाई केली जाते. नेटवर्क प्रोव्हायरडकडे वारंवार दाद मागूनही काही फायदा होत नसेल तर तुम्ही 'ट्राय'ला तसा ईमेल पाठवावा.

मोबाईल नंबर पोर्ट करायचाय, कंपनी चालढकल करतेय, कुठे तक्रार कराल?
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 09, 2021 | 10:53 AM
Share

मुंबई: स्मार्टफोनधारकांना मोबाईल कॉल ड्रॉप होणे किंवा डेटा स्पीड कमी असणे, अशा समस्यांना अनेकदा सामोरे जावे लागते. कंपनीकडे वारंवार याची तक्रार करून समस्या सुटत नसेल तर ग्राहक मोबाईल क्रमांक पोर्ट करायचा पर्याय स्वीकारतात. परंतु, मोबाईल नंबर पोर्ट करताना ग्राहकांना हमखास मोबाईल नेटवर्क प्रोव्हायडर कंपन्यांच्या मनमानीचा अनुभव येतो. या कंपन्या ग्राहक आपल्याकडून दुसऱ्या कंपनीकडे जाऊ नये, यासाठी पोर्ट आऊटच्या प्रक्रियेत आढेवेढे घेतात, चालढकल करतात. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागते.

मात्र, तुम्ही भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’कडे (TRAI) याची तक्रार नोंदवू शकता. तुमची तक्रार मिळाल्यानंतर ‘ट्राय’कडून संबंधित कंपनीवर योग्य कारवाई केली जाते. नेटवर्क प्रोव्हायरडकडे वारंवार दाद मागूनही काही फायदा होत नसेल तर तुम्ही ‘ट्राय’ला तसा ईमेल पाठवावा. यामध्ये तुम्ही कंपनीला केलेल्या तक्रारींचा क्रमांक आणि इतर तपशील नमूद करावा.

नियम काय आहे?

2011 पासून भारतात मोबाईल पोर्टेबिलिटीची सुविधा उपलब्ध झाली. त्यामुळे तुम्हाला एखाद्या कंपनीकडून चांगली सेवा मिळत नसेल तुम्ही दुसऱ्या कंपनीत नंबर पोर्ट करू शकता. त्यासाठी तुम्ही 1900 या क्रमांकावर मेसेज करुन पोर्ट आऊटची रिक्वेस्ट पाठवू शकता. त्यानंतर हा पोर्ट नंबर नव्या कंपनीला देऊन तुम्ही नेटवर्क चेंज करू शकता. नंबर पोर्ट आऊट करण्यासाठी साधारण पाच दिवसांचा अवधी लागतो.

ग्राहकांना काय अधिकार असतात?

तुम्ही जेव्हा मोबाईल नंबर एका कंपनीतून दुसरीकडे पोर्ट आऊट करता तेव्हा तुमची कंपनी हमखास त्यामध्ये अडथळे आणते. तुम्हाला त्याच कंपनीत राहण्यासाठी अनेक प्रलोभनं दाखवली जातात. या प्रक्रियेत चालढकल केली जाते. तुमचा क्रमांक पोस्टपेड असेल तर मोबाईल कंपन्या पोर्ट आऊटसाठी बरेच आढेवेढे घेतात. अशावेळी तुम्ही TRAI अथवा ग्राहक संरक्षण केंद्राकडे दाद मागू शकता. त्यानंतर नेटवर्क प्रोव्हायडर कंपनी दोषी असल्याचे सिद्ध झाले तर ग्राहकाला नुकसानभरपाई मिळते.

संबंधित बातम्या:

महागडा मोबाईल, त्याचा विमा, नंतर क्लेम, पोलिसात तक्रारीचा कट आणि महिला अडचणीत

भारतात कोणती कंपनी मोबाईल इंटरनेटमध्ये अव्वल? ट्रायची नवी आकडेवारी जाहीर

वोडाफोन-आयडियाचा नवा प्लान लाँच, 100 जीबीचा हायस्पीड डेटा मिळणार

Follow Us
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना.
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती.
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या....
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा.
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान
सगळ्या पदांपेक्षा मोठी ओळख लाडका भाऊ; एकनाथ शिंदेंचं विधान.
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट
महिला दिनानिमित्त सीएसएमटी मेट्रो स्थानकात आकर्षक सजावट.
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.