AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्यवसायिकच नाही तर नोकरदारांनाही भरावा लागतो अ‍ॅडव्हान्स टॅक्स; जाणून घ्या अ‍ॅडव्हान्स टॅक्सचे नियम

सर्वसाधारणपणे अ‍ॅडव्हान्स टॅक्स फक्त व्यवसायिकांकडून भरला जातो, मात्र काही परिस्थितीमध्ये नोकरदार वर्गाला देखील अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची गरज असते. नोकरदारांना कोणत्या परिस्थितीत अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरावा लागतो हे आज आपण जाणून घेणार आहोत.

व्यवसायिकच नाही तर नोकरदारांनाही भरावा लागतो अ‍ॅडव्हान्स टॅक्स; जाणून घ्या अ‍ॅडव्हान्स टॅक्सचे नियम
| Updated on: May 01, 2022 | 5:30 AM
Share

मुंबई : सर्वसाधारणपणे असे मानले जाते की अ‍ॅडव्हान्स टॅक्स (Advance tax) फक्त व्यावसायिकांकडून (Business Man) भरला जातो. पण अशा काही परिस्थिती असतात जेव्हा नोकरदार (Servant) लोक देखील अ‍ॅडव्हान्स टॅक्सच्या कक्षेत येतात? उदाहरणार्थ नाशिकमध्ये राहणारा रोहित हा सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. रोहितने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये नोकरी बदलली. नवीन कंपनीने पगारातून कोणताही टीडीएस कापला नाही. सामान्य परिस्थितीत कंपन्या डीक्लेरेशननंतर 2.5 लाख रुपयांची सूट देतात. उर्वरित पगार संपूर्ण वर्षाचे उत्पन्न म्हणून गृहित धरले जाते आणि ते करपात्र बनवतात. कंपनी दर महिन्याला टीडीएसच्या नावाखाली पगारातून कपात करत असते. जेव्हा तुम्ही एकाच आर्थिक वर्षात नोकरी बदलता तेव्हा हे गणित अनेक वेळा बिघडते. कारण दोन फॉर्म 16 एकाच आर्थिक वर्षात तयार होतात. दोन्ही कंपन्या त्यांनी दिलेला पगार हे वर्षभराचे उत्पन्न मानतात. अशा परिस्थितीत पगारदारांनी आगाऊ कर भरावा. आगाऊ कर हा उत्पन्नासह आकारला जाणारा कर आहे. म्हणजेच तुम्ही जितक्या लवकर कमावता तितक्या लवकर तुम्ही कर वसूल करत रहा. लक्षात ठेवा की तुमची वार्षिक कर देयता 10,000 रु. पेक्षा जास्त असेल तरच आगाऊ कर जमा करणे आवश्यक आहे, असे चार्टर्ड अकाउंटंट अंकित गुप्ता म्हणतात.

पगाराव्यतिरिक्त उत्पन्न असल्यास अ‍ॅडव्हान्स टॅक्स

त्याचप्रमाणे पगारदार व्यक्तीला पगाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्रोतातून उत्पन्न असल्यास उदाहरणार्थ, भाडे, लाभांश, व्याज इत्यादीतून कर देयक 10,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्याला आगाऊ कर भरावा लागतो. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना आगाऊ कर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. परंतु त्यांना मिळणारं उत्पन्न व्यावसायिक नसावं. जर तुम्ही एका आर्थिक वर्षात दोन नोकऱ्या बदलल्या असतील तर अशा वेळी किती कर भरावा लागणार आहे ते विचारात घ्या, जर अ‍ॅडव्हान्स टॅक्स असेल तर तो वेळेवर भरा आणि दंड टाळा.

आगाऊ कराचे चार हप्ते

आर्थिक वर्षात एकूण 4 हप्त्यांमध्ये आगाऊ कर भरला जातो. पहिला हप्ता 15 जून, दुसरा 15 सप्टेंबरपर्यंत, तिसरा 15 डिसेंबरपूर्वी आणि चौथा 15 मार्चपूर्वी भरावा लागतो. पहिल्या हप्त्यात एकूण कर रकमेच्या 15 टक्के, दुसऱ्या हप्त्यात एकूण कर दायित्वाच्या 45 टक्के रक्कम भरावी लागते. तर तिसऱ्या हप्त्यात एकूण कर देयकाच्या 75 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. आणि शेवटच्या हप्त्यात 100 टक्के कर भरणे आवश्यक आहे. जर तुम्हाला अ‍ॅडव्हान्स टॅक्स भरण्याची आवश्यकता असेल तर तो वेळीच भरा आणि दंडापासून सुटका करून घ्या, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.