AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मान्सूनची आनंद पेरणी, महागाई वरुणधारेत विरघळणार! भारती उद्योग महासंघाला विश्वास

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे, तर दुसरीकडे मान्सूनने अंदमानातून आनंदवार्ता पेरली आहे. त्यामुळे महागाई या वरुणधारेत विरघळून जाईल आणि आटोक्यात येईल असा विश्वास भारतीय उद्योग महासंघाने व्यक्त केला आहे.

मान्सूनची आनंद पेरणी, महागाई वरुणधारेत विरघळणार! भारती उद्योग महासंघाला विश्वास
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
| Updated on: May 17, 2022 | 10:58 AM
Share

भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) बेंचमार्क ऋण दरात (Repo Rate) वाढ केली आहे. तर दुसरीकडे मान्सूनने (Monsoon) अंदमान बेटावर दस्तक दिल्याने देशभरात आनंदवार्ता पेरली गेली आहे. त्यामुळे भडकलेल्या महागाईवर पावसाचा अभिषेक होऊन ती आटोक्यात येईल. महागाई या वरुणधारेत विरघळून जाईल असा विश्वास भारतीय उद्योग महासंघाने CII व्यक्त केला आहे. महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजीव बजाज यांनी सोमवारी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महागाई आणि आरबीआयच्या कर्ज दराविषयी भाष्य केले. आरबीआयने रेपो दरात केलेली वाढ पथ्यावर पडून महागाई कमी होण्यास मदत मिळेल. ग्राहकांना या वाढत्या व्याजदरांचा फायदा होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. सोबतच देशभरात यंदा पाऊस समाधानकारक असल्याचे संकेत महागाईला आटोक्यात आणण्यासाठी मदत करतील. वर्षाच्या सहामाहीत नियोजनकर्त्यांना मुद्रास्फीती आणि व्याज दरांबाबत निर्णय घेण्यास सहकार्य मिळेल असे देखील त्यांनी म्हटले आहे. मागणी आणि पुरवठा यांच्या परस्पर पुरक स्थिती पाहता केंद्रीय बँकेने मुद्रास्फीती दर वाढण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने पहिल्यांदा व्याज दरांमध्ये वाढ करण्याच्या चक्राला गती दिली आहे. त्यामुळे आता  भविष्यात पुन्हा व्याज दर वाढण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सकल देशातंर्गत उत्पादन वृद्धी दर 8.2 टक्क्यांच्या घरात

देशाची केंद्रीय बँकेने रेपो दरात वाढ करुन त्यांचा रोख स्पष्ट केला आहे. अपेक्षा आहे की, येत्या काही दिवसांत बँक अशीच दरवाढ कायम ठेवेल अंस बजाज यांनी म्हटले आहे. महासंघाच्या अंदाजानुसार भारताचे सकल देशातंर्गत उत्पादन दरात (GDP) वृद्धी होईल. हा वृद्धी दर 7.4 ते 8.2 टक्क्यांच्या दरम्यान राहील. परंतू, या वृद्धीवर  कच्च्या तेलाचे बंधन राहील. त्याआधारे हा वृद्धी दर कमी जास्त होऊ शकतो.

महागाईने उच्चांकी पातळी गाठली

वाचकांना माहितीच आहे की, देशातील किरकोळ महागाई गेल्या आठ वर्षातील सर्वात उच्चांकी पातळीवर पोहचली आहे. महागाईने सर्वसामान्य नागरिकांसह उच्च मध्यमवर्गीय वर्ग ही हैराण झाला आहे. आकड्यांनी महागाईची पोलखोल केली आहे. देशातील किरकोळ महागाई दर 7.79 टक्क्यांवर पोहचला आहे. खाद्य पदार्थांच्या किंमतीतील वाढ आणि तेलाच्या भडकलेल्या भावाने महागाई तिच्या उच्चांकी पातळीवर पोहचली आहे. यापूर्वी 2014 साली महागाई तिच्या उच्चांकी पातळीवर पोहचलेली होती. मे 2014 मध्ये महागाई दर 8.33 टक्क्यांवर होता. हा सलग चौथा महिना आहे, ज्या कालावधीत महागाईने रिझर्व्ह बँकेच्या अंदाजाला आपटी देऊन उच्चांकी पातळी गाठली आहे.

गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय
गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय.
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?
अजित पवार यांचं विमान पडलं, त्यानंतर पुन्हा 3 स्फोट? नेमकं काय घडलं?.
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता
जळालेल्या ब्लॅक बॉक्सचा डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवण्याची शक्यता.
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी
DGCA चा प्राथमिक अहवाल तत्काळ जाहीर करा, रोहित पवारांची मागणी.
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता
अमरावतीत बस स्थानकाची दुर्दशा; जीर्ण इमारतीमुळे प्रवाशांमध्ये चिंता.
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका
महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकरांची गणेश नाईकावर जोरदार टीका.
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया
सत्तारांच्या मंदिर भेटीवरून अंबादास दानवेंची मोठी प्रतिक्रिया.
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
छत्रपती संभाजीनगरचे आमदार, नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या भेटीला.
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले
...तर वनमंत्री काय कामाचे? गणेश नाईकांच्या भूमिकेवर नीलेश राणे संतापले.
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल
रायगडावरील शिवरायांचे समाधीस्थळ अंधारात, आमदार गोपीचंद पडळकरांकडून दखल.